शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुल

By admin | Updated: July 19, 2016 01:40 IST

वारसा : नाशिकमध्ये वेद पाठशाळांमध्ये होतेय प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे जतन

भारतात कोणे एकेकाळी गुरू-शिष्य परंपरेनुसार शिक्षण दिले जात असे. मुले आश्रमांत राहत, अध्यापन करीत व निरनिराळ्या विद्यांत पारंगत होत. कालौघात ही निवासी शिक्षणपद्धती मागे पडत गेली. तथापि, नाशिक परिसरात अद्यापही काही वेद पाठशाळांमध्ये याच प्राचीन परंपरेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त अशाच काही गुरुकुलांचा हा परिचय...ज्येष्ठ उद्योजक किसनलाल सारडा यांनी श्री गुरुगंगेश्वर वेद पाठशाळेची स्थापना सन १९८४ मध्ये केली. त्र्यंबकरोड येथील वेदमंदिरामागे काही वर्षे ही पाठशाळा सुरू होती. सन २००० मध्ये ती महिरावणी येथे प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आली. पाठशाळेत सध्या उत्तर प्रदेश, हैदराबादसह नाशिक, मुंबई आदि भागांतील अकरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शुक्ल यजुर्वेद संहिता शिकवली जाते. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तो पूर्ण केल्यानंतर वेदविशारद ही पदवी मिळते. पुढे आणखी अभ्यास करून ही मुले घनपाठीही होऊ शकतात. पाठशाळेत सागर कुलकर्णी हे अध्यापन करतात, तर किशोर बोरसे हे व्यवस्थापनाची बाजू सांभाळतात. पहाटे पाच वाजेपासून विद्यार्थ्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ५ अशी पाठशाळेची वेळ असते. सकाळी उठल्यानंतर विद्यार्थी हे प्रार्थना, धावणे, सूर्यनमस्कार घालतात. कोणत्याही गुरुकुलात विद्यार्थ्यांना स्वत:ची कामे स्वत: करावी लागतात. त्यामुळे स्वयंशिस्त लागते. वडील स्वत: वेद अभ्यासक असल्यास वा पौरोहित्य करीत असल्यास आपल्या मुलाने हा वारसा पुढे चालवावा म्हणून ते त्यांना गुरुकुलात दाखल करीत असतात. निवासी पाठशाळेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांना वेदविद्येचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळते. दरम्यान, श्री गुरुगंगेश्वर वेदपाठशाळेचे विद्यार्थी गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिकला वेद मंदिरात येणार असून, तेथे वेदपठण करणार आहेत.

नाशिकपासून बारा किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रोडवरील लाखलगाव परिसरात महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने निवासी वेद पाठशाळा चालवली जाते. बारा वर्षांपूर्वी श्रीकृष्णशास्त्री गोडसे यांनी या पाठशाळेची पंचवटीतील सीतागुंफा येथे स्थापना केली. त्यानंतर काही वर्षे ही पाठशाळा गंगापूर गावात, तर वर्षभरापासून लाखलगाव येथे सुरू आहे. पाठशाळेत राज्याच्या विविध भागांतील पंचवीस मुले वेदविद्येचे शिक्षण घेतात. पाठशाळेत विद्यार्थ्यांना प्राचीन गुरू-शिष्य परंपरेनुसार यजुर्वेद, संस्कृत व्याकरणासह इंग्रजी, गणित, विज्ञान, भूगोल, संगणक आदि विषयांचे शिक्षण मोफत दिले जाते. विद्यार्थी पहाटे साडेचार वाजता उठतात. स्नानानंतर प्रात:संध्या, चहापान-नाश्ता, सकाळी ८ ते ११ या वेळेत अध्ययन, १२ वाजता भोजन, दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत पाठशाळा, त्यात वेदमंत्रांचे पठण, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सायंसंध्या, ७ वाजता आरती व शिवमहिम्न स्तोत्राचे सामूहिक पठण, ८ वाजता भोजन, रात्री ९ वाजता श्लोक पाठांतर, रात्री १० वाजता हनुमान चालिसा पठण करून निद्राधीन होणे अशी विद्यार्थ्यांची दिनचर्या असते. सात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे बारावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र मिळते. विद्यार्थी अन्यत्र त्यापुढेही शिक्षण घेऊ शकतात. वेदशास्त्रसंपन्न रवींद्र पैठणे पाठशाळेचे प्रधान आचार्य असून, त्यांच्यासह गोविंद पैठणे अध्यापनाचे काम पाहतात.