शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

गुरुकुल

By admin | Updated: July 19, 2016 01:40 IST

वारसा : नाशिकमध्ये वेद पाठशाळांमध्ये होतेय प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे जतन

भारतात कोणे एकेकाळी गुरू-शिष्य परंपरेनुसार शिक्षण दिले जात असे. मुले आश्रमांत राहत, अध्यापन करीत व निरनिराळ्या विद्यांत पारंगत होत. कालौघात ही निवासी शिक्षणपद्धती मागे पडत गेली. तथापि, नाशिक परिसरात अद्यापही काही वेद पाठशाळांमध्ये याच प्राचीन परंपरेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त अशाच काही गुरुकुलांचा हा परिचय...ज्येष्ठ उद्योजक किसनलाल सारडा यांनी श्री गुरुगंगेश्वर वेद पाठशाळेची स्थापना सन १९८४ मध्ये केली. त्र्यंबकरोड येथील वेदमंदिरामागे काही वर्षे ही पाठशाळा सुरू होती. सन २००० मध्ये ती महिरावणी येथे प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आली. पाठशाळेत सध्या उत्तर प्रदेश, हैदराबादसह नाशिक, मुंबई आदि भागांतील अकरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शुक्ल यजुर्वेद संहिता शिकवली जाते. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तो पूर्ण केल्यानंतर वेदविशारद ही पदवी मिळते. पुढे आणखी अभ्यास करून ही मुले घनपाठीही होऊ शकतात. पाठशाळेत सागर कुलकर्णी हे अध्यापन करतात, तर किशोर बोरसे हे व्यवस्थापनाची बाजू सांभाळतात. पहाटे पाच वाजेपासून विद्यार्थ्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ५ अशी पाठशाळेची वेळ असते. सकाळी उठल्यानंतर विद्यार्थी हे प्रार्थना, धावणे, सूर्यनमस्कार घालतात. कोणत्याही गुरुकुलात विद्यार्थ्यांना स्वत:ची कामे स्वत: करावी लागतात. त्यामुळे स्वयंशिस्त लागते. वडील स्वत: वेद अभ्यासक असल्यास वा पौरोहित्य करीत असल्यास आपल्या मुलाने हा वारसा पुढे चालवावा म्हणून ते त्यांना गुरुकुलात दाखल करीत असतात. निवासी पाठशाळेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांना वेदविद्येचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळते. दरम्यान, श्री गुरुगंगेश्वर वेदपाठशाळेचे विद्यार्थी गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिकला वेद मंदिरात येणार असून, तेथे वेदपठण करणार आहेत.

नाशिकपासून बारा किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रोडवरील लाखलगाव परिसरात महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने निवासी वेद पाठशाळा चालवली जाते. बारा वर्षांपूर्वी श्रीकृष्णशास्त्री गोडसे यांनी या पाठशाळेची पंचवटीतील सीतागुंफा येथे स्थापना केली. त्यानंतर काही वर्षे ही पाठशाळा गंगापूर गावात, तर वर्षभरापासून लाखलगाव येथे सुरू आहे. पाठशाळेत राज्याच्या विविध भागांतील पंचवीस मुले वेदविद्येचे शिक्षण घेतात. पाठशाळेत विद्यार्थ्यांना प्राचीन गुरू-शिष्य परंपरेनुसार यजुर्वेद, संस्कृत व्याकरणासह इंग्रजी, गणित, विज्ञान, भूगोल, संगणक आदि विषयांचे शिक्षण मोफत दिले जाते. विद्यार्थी पहाटे साडेचार वाजता उठतात. स्नानानंतर प्रात:संध्या, चहापान-नाश्ता, सकाळी ८ ते ११ या वेळेत अध्ययन, १२ वाजता भोजन, दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत पाठशाळा, त्यात वेदमंत्रांचे पठण, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सायंसंध्या, ७ वाजता आरती व शिवमहिम्न स्तोत्राचे सामूहिक पठण, ८ वाजता भोजन, रात्री ९ वाजता श्लोक पाठांतर, रात्री १० वाजता हनुमान चालिसा पठण करून निद्राधीन होणे अशी विद्यार्थ्यांची दिनचर्या असते. सात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे बारावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र मिळते. विद्यार्थी अन्यत्र त्यापुढेही शिक्षण घेऊ शकतात. वेदशास्त्रसंपन्न रवींद्र पैठणे पाठशाळेचे प्रधान आचार्य असून, त्यांच्यासह गोविंद पैठणे अध्यापनाचे काम पाहतात.