शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

गुरव, पुजारी बांधवांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:45 IST

विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : विविध सामूहिक सोहळ्यांना बंदी

ब्राह्मणगाव : विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.मंगल वाद्य वाजवणे, घरोघरी जाऊन बिल्वपत्र वाटणे, फुलहार विकणे, गाव, शहरातील शिव मंदिरांत पूजा व साफसफाई करणे अशी कामे गुरव समाजबांधव करतो. त्यामुळे मिळणाºया पैसांवर त्याचा उदरविर्नाह चालतो. परंतु कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे व विविध सोहळे व इतर सोहळ्यांना बंदी असल्याने चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न या वर्गाला पडला आहे. कोरोनामुळे उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे मोठे संकट आल्याने आम्ही भांबावले आहोत. भविष्याची कोणतीही आर्थिक तरतूद नाही. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संकटाला तोंड द्यावे लागत आहे. भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असे मंगल वाद्य वाजवणारे शरद गुरव यांनी सांगितले.लग्नसराई म्हटली की मंगलवाद्याला मागणी असते. सनई-चौघडा असला की विवाह सोहळ्यात चैतन्याचे वातावरण निर्माण होते. मात्र मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने विवाह सोहळे थांबले आहेत. सर्व अर्थकारण ठप्प झाले आहे. व्यवसाय बंद पडल्यामुळे गुरव समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे बंद केल्याने मंदिराबाहेरील सर्वच लहान-मोठी दुकाने बंद झाली आहेत.फूलमाला, बिल्वपत्र वाटणेही बंद झाल्याने सर्वच आवक बंद झाली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शासन आदेशामुळे ठरावीक लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पाडली जात आहेत. मंगलवाद्य वाजविण्यासाठी परवानगी दिल्यास आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल, अशी भावनाही शरद गुरव यांनी व्यक्त केली.बेलपत्र वाटणे, मंदिराची साफसफाई, दिवाबत्ती आदी कामे आम्ही करतो. सध्य कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने ही कामे बंद आहेत. दोन पैसे मिळण्यासाठी शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी.- शरद गुरव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय