शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

मार्गदर्शकच नव्हे, मित्रदेखील !

By admin | Updated: February 3, 2017 01:52 IST

मार्गदर्शकच नव्हे, मित्रदेखील !

 

किरण अग्रवाल

ज्या खांद्यावर मान ठेवून अनेक लढाया निर्धास्तपणे लढत आलो, झुंजत आलो, तो खांदाच निखळला म्हटल्यावर अश्रूंचे स्तब्ध होणे स्वाभाविकच आहे. अर्थात अशा स्तब्धतेतही बातमी शोधायची शिकवण ज्यांनी दिली त्या मार्गदर्शकालाच शब्दांजली अर्पण करायची वेळ येणे हा तसा दैवदुर्विलासच, पण तो ओढवला आहे खरा.पत्रकारिता आज अनेकार्थाने बदलली व विस्तारलीही आहे. परिणामी काळाच्या आव्हानांचा सामना करताना अनेकांकडून अनेक गोष्टी सुटून जाताना दिसून येतात. अशा स्थितीत आपल्या तत्त्वांना वा भूमिकांना चिकटून राहात परखडपणा जोपासायचा तर ते सहज सोपे खचितच नव्हते. पण हेमंतराव त्याला अपवाद होते. संपादक हा त्याच्या लिखाणाने ओळखला जायला हवा, त्यासाठी त्याचा चेहरा वाचकांना परिचयाचा असण्याची गरजच नाही, या विचारांपासून ते तसुभरही ढळले नाहीत. पत्रकारितेसह सर्वच बाबतीत दिसून येणारी त्यांची तटस्थता ही त्यातूनच आलेली होती. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे कुणी कितीही कौतुक केले तरी त्याने हुरळून जाणे त्यांच्या स्वभावात नव्हते. आपल्याला जे दिसते आहे, मनाला बोचते आहे, ते परखडपणे लिहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. ही तटस्थता व परखडपणा हा त्यांचा स्थायीभाव होता खरा, पण त्यापलीकडे जाऊन त्यांच्याशी माझा स्नेह जुळला होता. त्यामुळे कार्यालयात ते माझे साहेब असले व आम्हा संपूर्ण ‘टीम’चे मार्गदर्शक असले तरी माझ्यासाठी ते एक मित्रही होते. ते १ डिसेंबर २00३ रोजी लोकमतमध्ये रुजू झाले, त्याच दिवशी माझ्या धाकट्या कन्येचा जन्म झाला. त्यामुळे माझे लोकमतमधील वय तुमच्या कन्येइतके आहे याची ते या तारखेस मला दरवर्षी आवर्जून आठवण करून देत. दैनंदिन कामाच्या धबडग्यात होणाऱ्या प्रकृतीकडील दुर्लक्षाबाबत रागावण्यापासून ते पाल्याच्या काळजीपर्यंतचे पालकत्व ते निभावत. अगदी परवा हॉस्पिटलमधून घरी आल्यावर त्यांच्या भेटीला गेलो असताही त्यांनी आपल्या प्रकृतीचे गाऱ्हाणे न गाता निवडणुकांचे दिवस असल्याने मलाच तब्येतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. पण त्यांचीच तब्येत अशी धोका देऊन जाईल, असा पुसटसा संशयदेखील तेव्हा आला नव्हता.पत्रकारितेतील मानदंड असणाऱ्या विद्याधर गोखले, माधवराव गडकरी, अरुण टिकेकर आदिंचे सान्निध्य लाभल्याने आणि वाचन अफाट असल्याने हेमंत कुलकर्णी म्हणजे आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी चालती-बोलती संदर्भ शाळाच होती. केवळ जिल्ह्याच्याच नव्हे; तर एकूणच राज्याच्या सहकार, कृषी, उद्योग, राजकारण आणि साहित्याचे ते पटापट पटच उलगडून दाखवित. बातमीच्या अनुषंगाने एखादा विषय निघाला की ते भूतकाळात हरवायचे आणि बोलता-बोलता सहजगत्या अनेक संदर्भ देऊन जायचे.विशेष म्हणजे, संपादक म्हणून केवळ अग्रलेख न लिहिता अगदी वाचकांचा पत्रव्यवहारही ते तितक्याच समरसतेने लिहीत. संपादक झालो असलो तरी मी मूळ बातमीदार आहे व तोच राहणार हे ते वारंवार सांगत. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काही अनपेक्षित घडले की, त्यांची बोटे वळवळायची आणि अग्रलेख, वृत्तलेख व नाहीच काही तर अगदी बातमीदेखील प्रसवायचे. पण लिहिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. बेचैनी हेच खरे पत्रकारितेचे लक्षण असते हे त्यांच्या निमित्ताने आम्हास शिकावयास मिळाले. हेमंतराव त्यांच्या खास ‘तिरकस’ शैलीसाठी व परखड लिखाणासाठी ओळखले जात. लोकमतसाठी त्यांनी लिहिलेल्या जवळपास सर्वच लिखाणाचा पहिला वाचक होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी काही लिहिले की, त्यांचा फोन येई, ‘महोदय, एक फाईल टाकली आहे, जरा ओके करून द्या.’ संपादक असतानाही एका कनिष्ठ सहकाऱ्याला इतके मोठेपण देणारे हेमंतराव दुर्मिळच. अधिकाराच्याच नव्हे तर मित्रत्वाच्या नात्याने असे ‘महोदय’ म्हणून पुकारणारा आवाज आता कायमचा स्तब्ध झाला आहे.