शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी खालावली : २९ गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; महिलांची भटकंती येवला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST

येवला : तालुक्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढू लागली असून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत पूर्णपणे आटले असून, पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे.

ठळक मुद्देपाणी अडवा, पाणी जिरवा केवळ कागदावरखरी उन्हाची तीव्रता आणि चटके आता येवला तालुक्याच्या सर्वच भागास

येवला : तालुक्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढू लागली असून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत पूर्णपणे आटले असून, पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मे महिन्यात तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भूजल पातळी आणखी खाली चालली असून, वर्षानुवर्षे पाणी टँकरचे तालुक्याला लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याने ग्रामस्थांना उन्हाळा असह्य होत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा केवळ कागदावर राहिले असल्याचे स्पष्ट होत आहे. नगरसूल परिसरात असलेल्या १९ वाड्या-वस्तींवरचे प्रस्ताव पंचायत समितीमधून प्रांत कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राण्यांची भटकंतीखरी उन्हाची तीव्रता आणि चटके आता येवला तालुक्याच्या सर्वच भागास बसत आहेत. माणसांना उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत, तर हरणे, मोरांसह वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. सर्वच तळी, नाले, डबके कोरडेठाक पडले असून, वृक्ष, गवत, वेलीही करपून गेल्याने जंगलातील हरणांचे कळप अन्न व मुख्यू म्हणजे पाण्यासाठी भटकत आहेत. यामुळे जंगलातील हरणे, मोर व वन्यप्राण्यांसाठी तयार केलेल्या ‘वॉटर होल’मध्ये टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु ही व्यवस्थादेखील अपुरी पडत आहे. वॉटर होलमधून वाड्यावर राहणारे लोक आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी हरणांच्या व वन्यप्राण्यांसाठीचे पाणीदेखील घेऊन जात असल्याचे चित्र आहे.