शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाजात नाराजीचा सूर

By admin | Updated: January 16, 2017 01:17 IST

शासनाच्या भूमिकेवर टीका : समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

 नाशिक : महाराष्ट्रात माळी समाजाचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक असतानादेखील सामाजिक आणि राजकीय विकासाच्या बाबतीत शासनाची दुटप्पी भूमिका असून, आश्वासनापलीकडे कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने माळी समाजात नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर माळी समाजाच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे सोमवारी (दि.१६) बोरिवली येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचवटी येथे झालेल्या माळी समाजाच्या बैठकीदरम्यान माळी समाजाचे ज्येष्ठ नेते बाजीराव तिडके यांनी दिली. सोमवारी बोरकरवाडी, बोरिवली येथील रॉयल गार्डन येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात माळी समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, राज्य सरकारने इतर जातीतील मंत्रिपदाच्या तुलनेत माळी समाजालाही मंत्रिपद द्यावे, राज्य सरकारने स्वतंत्रपणे ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी त्वरित करून यासाठी शासनाच्या तिजोरीतून ५२ टक्के स्वतंत्र निधी देण्यात यावा, शासनातर्फे मागासवर्गीय आयोगाची घोषणा करण्यात आली असली तरी यात अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदासाठी ओबीसी समाजातील व्यक्तीची निवड करणे आदिंबाबत मागणी करण्यात येणार आहे. माळी समाजापुढे असणाऱ्या विविध प्रश्नांमुळे या समाजाचे खच्चीकरण करण्याचा डाव तर नाही ना अशी भावना समाजबांधवांच्या मनात निर्माण झाली आहे. यावेळी सोमवारी बोरिवली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीसाठी माळी समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)