शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

मानवतेचा वसा जपलेल्यांना सलाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 02:05 IST

मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले. कोरोना काळात असा मानवतेचा वसा घेऊन कार्यरत राहिलेल्या प्रत्येकाला सलाम करुन हा सन्मान त्या सर्वांना अर्पण करीत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात टोपे यांच्यासह पं. सुरेश तळवलकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पटवर्धन, अतुल पेठे आणि सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे‘गोदावरी गौरव’पुरस्काराने ६ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार

नाशिक : मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले. कोरोना काळात असा मानवतेचा वसा घेऊन कार्यरत राहिलेल्या प्रत्येकाला सलाम करुन हा सन्मान त्या सर्वांना अर्पण करीत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात टोपे यांच्यासह पं. सुरेश तळवलकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पटवर्धन, अतुल पेठे आणि सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

येथील रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी टोपे यांनी हा पुरस्कार यापूर्वी खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला असल्याने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आल्याचे सांगितले. आपण प्रत्येक जण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून कार्यरत रहायला हवे. कोरोना काळात मालेगाव, धारावीसारख्या भागात जाऊन तसेच प्रत्येक आरोग्यकर्मींना प्रेरित करताना हीच भावना त्यांच्यात वाढवण्याचे प्रयत्न केल्याचेही टोपे यांनी नमूद केले. लेखक संशोधक डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी विज्ञान ही एक विचारपद्धती असल्याची भावना समाजात रुजणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विज्ञान निर्मितीची मूळ प्रेरणा ही जिज्ञासाच असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे बालकांपर्यंत आपल्याच मातृभाषेतून पोहोचल्यास त्यांना ते झटकन उमगते. त्यामुळे ज्ञान मराठीतून पाेहोचविण्यासाठी सजगतेने प्रयास करणार असल्याचेही डॉ. प्रधान यांनी नमूद केले. ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाशिकमध्ये १९९० च्या दशकात नोकरीसाठी आलो असतानाच्या काळातील प्रयोग परिवाराच्या माध्यमातून केलेल्या कार्याच्या आठवणी सांगितल्या. प्रत्येक कलेने मन आणि बुद्धी सुसंस्कृत आणि सृजनशील होते. ही सृजनशीलता मरु नये, यासाठी प्रयास आवश्यक असल्याचेही पेठे यांनी नमूद केले. चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी अन्य कलांइतका प्रेक्षक अद्यापही चित्रकलेला लाभला नसल्याचे सांगितले. जोपर्यंत चित्रकलेचा प्रेक्षक वाढत नाही आणि कला सर्वदूर पोहोचत नाही, तोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणार नसल्याचेही पटवर्धन यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक