शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

मानवतेचा वसा जपलेल्यांना सलाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 02:05 IST

मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले. कोरोना काळात असा मानवतेचा वसा घेऊन कार्यरत राहिलेल्या प्रत्येकाला सलाम करुन हा सन्मान त्या सर्वांना अर्पण करीत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात टोपे यांच्यासह पं. सुरेश तळवलकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पटवर्धन, अतुल पेठे आणि सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे‘गोदावरी गौरव’पुरस्काराने ६ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार

नाशिक : मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले. कोरोना काळात असा मानवतेचा वसा घेऊन कार्यरत राहिलेल्या प्रत्येकाला सलाम करुन हा सन्मान त्या सर्वांना अर्पण करीत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात टोपे यांच्यासह पं. सुरेश तळवलकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पटवर्धन, अतुल पेठे आणि सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

येथील रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी टोपे यांनी हा पुरस्कार यापूर्वी खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला असल्याने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आल्याचे सांगितले. आपण प्रत्येक जण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून कार्यरत रहायला हवे. कोरोना काळात मालेगाव, धारावीसारख्या भागात जाऊन तसेच प्रत्येक आरोग्यकर्मींना प्रेरित करताना हीच भावना त्यांच्यात वाढवण्याचे प्रयत्न केल्याचेही टोपे यांनी नमूद केले. लेखक संशोधक डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी विज्ञान ही एक विचारपद्धती असल्याची भावना समाजात रुजणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विज्ञान निर्मितीची मूळ प्रेरणा ही जिज्ञासाच असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे बालकांपर्यंत आपल्याच मातृभाषेतून पोहोचल्यास त्यांना ते झटकन उमगते. त्यामुळे ज्ञान मराठीतून पाेहोचविण्यासाठी सजगतेने प्रयास करणार असल्याचेही डॉ. प्रधान यांनी नमूद केले. ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाशिकमध्ये १९९० च्या दशकात नोकरीसाठी आलो असतानाच्या काळातील प्रयोग परिवाराच्या माध्यमातून केलेल्या कार्याच्या आठवणी सांगितल्या. प्रत्येक कलेने मन आणि बुद्धी सुसंस्कृत आणि सृजनशील होते. ही सृजनशीलता मरु नये, यासाठी प्रयास आवश्यक असल्याचेही पेठे यांनी नमूद केले. चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी अन्य कलांइतका प्रेक्षक अद्यापही चित्रकलेला लाभला नसल्याचे सांगितले. जोपर्यंत चित्रकलेचा प्रेक्षक वाढत नाही आणि कला सर्वदूर पोहोचत नाही, तोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणार नसल्याचेही पटवर्धन यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक