शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
4
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
5
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
6
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
7
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
8
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
9
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
12
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
13
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
14
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
17
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
18
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
19
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
20
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

नाशिकमधील बिहारी बांधवांचा आनंदोत्सव

By admin | Updated: November 9, 2015 00:41 IST

सकाळपासून उत्सुकता : पाच वर्षांत विकासाची अपेक्षा

सातपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हाती पुन्हा राज्याची सूत्रे दिल्याने नाशिकमधील बिहारी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाच वर्षांत बिहारचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सकाळपासून या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती. पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर आनंदाचे वातावरण पसरले.बिहारच्या निवडणुकीत बिहारी जनतेने पुन्हा नितीशकुमार यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे पुन्हा लोकांनी विश्वास टाकला आहे. - अमरेंदर सिंग, श्रमिकनगरबिहारच्या निवडणुकीत जात-पात आणि वर्णभेद असा खालच्या पातळीवर सर्वत्र राजकीय पक्षांनी प्रचार केला गेला. जाती-पातीच्या राजकारणामुळेच पुन्हा लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांनी सत्ता प्राप्त केली.- दिनेश शुक्ल, शिवाजीनगरनितीशकुमार, लालूप्रसाद आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन महाआघाडी तयार केली. भाजपाच्या विरोधातील महाआघाडीने बहुमत प्राप्त केले. विशेष म्हणजे नितीनकुमार यांच्यामुळेच हे बहुमत प्राप्त झाले आहे.- अमितकुमार महातो, माळी कॉलनीबिहारचा अद्याप विकास झालेला नाही. तेथील जनता पूर्णपणे साक्षर नाही. अज्ञानी आहे. अज्ञानी ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांनीच केला आहे. भाजपा सत्तेत आली असती, तर भाजपाने बिहारचा विकास केला असता.- उदय सिंग, श्रमिकनगरलालूप्रसाद, नितीशकुमार यांच्या हाती सत्ता दिली. त्यात लालूप्रसाद यांनी काहीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी थोड्या-फार प्रमाणात सुधारणा केल्या.- अजयकुमार महातो, माळी कॉलनीआजही बिहारमधील शाळा आणि दवाखान्यांमध्ये मोकाट जनावरांचा सर्रास वावर असतो. अशी स्थिती पहावयास मिळते. नितीशकुमार यांनीच सुधारणा केल्या. आता विकास साधावा.- हरिनंदन मिश्रा, आयटीआय कॉलनीबिहारचा विकास झाला नसल्याने तेथील बेरोजगार युवकांना रोजगार शोधण्यासाठी अन्य राज्यात जावे लागते. आता नितीशकुमार यांनी औद्योगिक क्षेत्राचा विकास करावा, उद्योग उभारावेत आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.- दिलीपसिंग, श्रमिकनगरबिहारचा निकाल अपेक्षित लागला. भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. त्याचा फटका त्यांनाच बसला. नितीशकुमार यांच्यामुळेच महाआघाडीला पुन्हा सत्ता मिळाली आहे.- श्रीकांत सिंग, माळी कॉलनीवाढती महागाई, पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वास हळूहळू कमी होऊ लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात चुकीचा प्रचार केल्याने भाजपाला पराभव पत्करावा लागला.- राम उदयसिंग, श्रमिकनगरबिहारचा कोणीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी काही प्रमाणात सुधारणा केल्या म्हणूनच पुन्हा नितीशकुमार यांना संधी मिळाली आहे. आता विकास करावा ही अपेक्षा.- हिराप्रसाद महातो, श्रमिकनगर