शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
9
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
10
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
11
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
12
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
13
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
14
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
15
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
16
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
17
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
18
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
19
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
20
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

नाशिकमधील बिहारी बांधवांचा आनंदोत्सव

By admin | Updated: November 9, 2015 00:41 IST

सकाळपासून उत्सुकता : पाच वर्षांत विकासाची अपेक्षा

सातपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हाती पुन्हा राज्याची सूत्रे दिल्याने नाशिकमधील बिहारी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाच वर्षांत बिहारचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सकाळपासून या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती. पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर आनंदाचे वातावरण पसरले.बिहारच्या निवडणुकीत बिहारी जनतेने पुन्हा नितीशकुमार यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे पुन्हा लोकांनी विश्वास टाकला आहे. - अमरेंदर सिंग, श्रमिकनगरबिहारच्या निवडणुकीत जात-पात आणि वर्णभेद असा खालच्या पातळीवर सर्वत्र राजकीय पक्षांनी प्रचार केला गेला. जाती-पातीच्या राजकारणामुळेच पुन्हा लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांनी सत्ता प्राप्त केली.- दिनेश शुक्ल, शिवाजीनगरनितीशकुमार, लालूप्रसाद आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन महाआघाडी तयार केली. भाजपाच्या विरोधातील महाआघाडीने बहुमत प्राप्त केले. विशेष म्हणजे नितीनकुमार यांच्यामुळेच हे बहुमत प्राप्त झाले आहे.- अमितकुमार महातो, माळी कॉलनीबिहारचा अद्याप विकास झालेला नाही. तेथील जनता पूर्णपणे साक्षर नाही. अज्ञानी आहे. अज्ञानी ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांनीच केला आहे. भाजपा सत्तेत आली असती, तर भाजपाने बिहारचा विकास केला असता.- उदय सिंग, श्रमिकनगरलालूप्रसाद, नितीशकुमार यांच्या हाती सत्ता दिली. त्यात लालूप्रसाद यांनी काहीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी थोड्या-फार प्रमाणात सुधारणा केल्या.- अजयकुमार महातो, माळी कॉलनीआजही बिहारमधील शाळा आणि दवाखान्यांमध्ये मोकाट जनावरांचा सर्रास वावर असतो. अशी स्थिती पहावयास मिळते. नितीशकुमार यांनीच सुधारणा केल्या. आता विकास साधावा.- हरिनंदन मिश्रा, आयटीआय कॉलनीबिहारचा विकास झाला नसल्याने तेथील बेरोजगार युवकांना रोजगार शोधण्यासाठी अन्य राज्यात जावे लागते. आता नितीशकुमार यांनी औद्योगिक क्षेत्राचा विकास करावा, उद्योग उभारावेत आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.- दिलीपसिंग, श्रमिकनगरबिहारचा निकाल अपेक्षित लागला. भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. त्याचा फटका त्यांनाच बसला. नितीशकुमार यांच्यामुळेच महाआघाडीला पुन्हा सत्ता मिळाली आहे.- श्रीकांत सिंग, माळी कॉलनीवाढती महागाई, पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वास हळूहळू कमी होऊ लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात चुकीचा प्रचार केल्याने भाजपाला पराभव पत्करावा लागला.- राम उदयसिंग, श्रमिकनगरबिहारचा कोणीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी काही प्रमाणात सुधारणा केल्या म्हणूनच पुन्हा नितीशकुमार यांना संधी मिळाली आहे. आता विकास करावा ही अपेक्षा.- हिराप्रसाद महातो, श्रमिकनगर