शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हिरवाईने नटला इगतपुरी तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:57 IST

घोटी : सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या आणि विपुल निसर्गसौंदर्य लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचा हा नेत्रसुखद सोहळा अनुभवण्यासाठी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपर्यटकांची रीघ : पावसामुळे धबधबे प्रवाहित

घोटी : सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या आणि विपुल निसर्गसौंदर्य लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचा हा नेत्रसुखद सोहळा अनुभवण्यासाठी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात सातत्याने वरुणराजाची कृपावृष्टी होत असते. इगतपुरी तालुक्यातील निसर्गराजी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आलेली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाºया पावसामुळे थळ घाट, भावली धरण परिसर, वैतरणा धरण परिसर आदी ठिकाणचे धबधबे प्रवाहित होऊ लागल्याने या भागात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. डोंगर-दºयांमुळे सुखावणाºया या वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मुंबई-ठाणे तसेच कोकण परिसरातून पर्यटक मोठ्या संख्येने इगतपुरी परिसरात येत असतात. विशेषत: शनिवार-रविवारी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पर्यटकांची मांदियाळी जमा झाल्याचे दिसून येते. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी पर्यटकांनी या परिसरात काजवा महोत्सवाचा आनंद लुटला. आता पावसाळ्यातील सुखावणारे वातावरण पर्यटकांना भुरळ पाडत आहे. युवकांना रोजगारयामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील डोंगर दºयांवर हिरवाईने शाल पांघरली असल्याने निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे. दरम्यान, धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांकडून थेट धबधब्याजवळ जाण्याचे प्रकार घडत आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.