शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नार-पार प्रकल्पासाठी हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:48 IST

सटाणा : उत्तर महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरणाºया नार-पार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच गुजरात राज्याशी करार करण्यात येऊन प्रकल्पाला गती देण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

ठळक मुद्देसुभाष भामरे : लवकरच गुजरातशी करार; साल्हेरला विविध खातेप्रमुखांसह सरपंचांची बैठक गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते हरणबारी धरणात टाकण्यात येणार

 

सटाणा : उत्तर महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरणाºया नार-पार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच गुजरात राज्याशी करार करण्यात येऊन प्रकल्पाला गती देण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजनांचा आढावा घेण्यासाठी व सांसद आदर्श गाव साल्हेरचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात शनिवारी (दि. १०) सायंकाळी साल्हेर येथे संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध खातेप्रमुख व तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.प्रारंभी डॉ. भामरे यांच्या हस्ते साल्हेर येथे उभारण्यात आलेल्या बीएसएनएल मनोºयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी डॉ. भामरे यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी साल्हेरला सांसद आदर्श गावमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा डॉ. भामरे यांनी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, डॉ. शेषराव पाटील, डॉ. विलास बच्छाव, गजेंद्र शंकपाळ, जिल्हा परिषद सदस्य लता बच्छाव, मीना मोरे, कन्हू गायकवाड, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, उपसभापती शीतल कोर, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, बिंदूशेठ शर्मा, आबा बच्छाव, डॉ. दिग्पाल गिराशे, नीलेश पाकळे, मंगेश खैरनार, राहुल सोनवणे, साहेबराव सोनवणे, शंकरराव सावंत, अविनाश सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. आर. पवार, कळवण प्रकल्प अधिकारी मित्तल, उपविभागीय कृषी अधीक्षक कैलास खैरनार, प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुंवर, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर, तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस तसेच जलसंपदा विभागाचे खातेप्रमुख, तापी खोºयाचे अभियंता आदी उपस्थित होते.सांसद आदर्श गाव साल्हेरचा एप्रिल महिन्यात गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. मुलभूत सुविधांबरोबरच पर्यटन स्थळ विकिसत करण्याच्या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात येणार आहे. अपघात विमा योजना तसेच शासनच्या विविध योजनांच्या माहितीसाठी विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. आरोग्यासाठी या गावातील प्रत्येक नागरिकाला क्र ेडीट कार्ड देण्यात येईल, शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच कृषी विकासासाठी प्रयत्न केला जाईल जेणेकरून त्याचा प्रत्येक व्यक्तीला लाभ होईल अशा पद्धतीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. येत्या १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या आराखड्याचे वाचन होऊन मेच्या पहिल्या आठवड्यात त्याला मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात येईल.- बी. राधाकृष्णन,जिल्हाधिकारी,नाशिक साल्हेर होणार मॉडेल व्हिलेज.....डॉ. भामरे यांनी साल्हेरची सांसद आदर्श गाव म्हणून घोषणा केली. विविध शासकीय योजना राबवून साल्हेर एक स्वयंपूर्ण गाव म्हणून नावारूपाला येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. साल्हेर गावाला ऐतिहासिक वारसा असून, याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी शत्रूशी सामना केला होता. गुजरातच्या सीमेवरील नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या साल्हेर गावासोबतच चाळीस वाड्यापाड्यांचा चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय पेय जल योजनेंतर्गत साल्हेरसह नऊ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याचेही डॉ. भामरे यांनी जाहीर केले. ही योजना सुमारे पाच कोटी रु पये खर्चाची असून, केळझर मध्यम प्रकल्पातून ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे. लवकरच योजनेचा आराखडा तयार करून निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वाघंबा वळण योजनेसाठी पावणेदोन कोटी... बागलाण तालुक्यातील सिंचन योजनांना गती देण्यासाठी पाणी उपलब्धता या तांत्रिक पूर्ततेची आवश्यकता आहे. पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यामुळे हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोच कालवा आणि चारी क्र मांक ८ च्या प्रलंबित कामाचा प्रश्न सुटला आहे. आता उजव्या कालव्यासाठी पाणी उपलब्धता ही मोठी समस्या असून, आघाडी सरकारने या कालव्याच्या प्रस्तावावर मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद करण्याचे पाप केले आहे. पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकारण करून उजळ माथ्याने फिरत असलेल्या पुढाºयांना जनतेने जाब विचारण्याची गरज असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. आगामी काळात हरणबारी उजवा कालवा आपले लक्ष्य असून, त्यासाठी शंभर दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी ३८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले. उर्वरित पाणी उपलब्ध करण्यासाठी वाघंबा वळण योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी पावणेदोन कोटी रु पयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते हरणबारी धरणात टाकण्यात येणार आहे. तसेच दुसºया टप्प्यात पाच वळण योजनांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, लवकरच त्यालादेखील मंजुरी देण्याचे काम आगामी काळात करण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.