शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

ग्रामीण भागात तीव्र संताप

By admin | Updated: February 4, 2017 01:19 IST

प्रादेशिक परिवहन विभाग : दर महिन्याला होणारे तालुकास्तरीय शिबिरे बंद

येवला : प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्याकडून प्रत्येक महिन्यात ग्रामीण भागातील जनतेच्या कामासाठी शिबिराचे आयोजन केले जाते. मात्र आता फेब्रुवारी २०१७ पासून सदर शिबिरे घेण्याचे बंद करण्यात आल्याचे कार्यालयाने जाहीर केल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. महिन्याच्या नियोजनाप्रमाणे परिवहन अधिकारी येवल्यात विश्रामगृह परिसरात आले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शिकाऊ परवाना देण्याचे काम होणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने येथे आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आता शिकाऊ परवाना काढण्यासाठी संबंधितांना आॅनलाइन अपॉइण्टमेंट घेऊन नाशिक येथे जावे लागणार आहे. त्यात वेळ व आर्थिक नुकसानही होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येक महिन्याला शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरांचे वेळापत्रक कार्यालयाने आगोदरच जारी केले आहे. त्यानुसार आज येथील शासकीय विश्रामगृहावर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात नेमकी कोणती कामे होणार, हे निश्चित नसल्याने परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने विश्रामगृह येथे हजर होते. येत्या काही दिवसात पोलीस विभाग व परिवहन विभाग यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार आहे. या दोन्ही विभागात चालक वाहन परवाना बंधनकारक असल्यामुळे आज येथे इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र काम न झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. परिवहन कार्यालयाने अचानकपणे निर्णय घेतला असून, प्रसिद्धिमाध्यमाद्वारे ग्रामीण भागातील जनतेसाठी हा निर्णय जाहीर केला असता तर आज आलेल्या नागरिकांची हेळसांड झाली नसती अशा प्रतिक्रि या नागरिकांनी व्यक्त केल्या तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या हट्टापाई ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय व हेळसांड होत असल्याची प्रतिक्रि या अनेकांनी व्यक्त केली.नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या अनाठायी भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन सारथी प्रणाली सुरु असून, तेथे शिबिरे व इतर सर्व कामे वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत होत आहेत. नाशिक विभागाला अशी काय अडचण आहे, असा सवाल विचारला जात आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या १ आणि २ तारखेला शिबिराचे आयोजन करण्यात येत असे. आज पुनर्नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने आली होती. मात्र काम न झाल्यामुळे वाहनधारकांना परत जावे लागले. आता ट्रॅक्टर व इतर वाहने पुनर्नोंदणीसाठी नाशिक येथे परिवहन विभागाच्या मुख्यालयात घेऊन जावी लागणार आहेत. (वार्ताहर)