शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी प्रवेशाचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशाचा आलेख यावर्षी मोठ्या प्रमाणात घसरला असून गेल्या काही ...

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशाचा आलेख यावर्षी मोठ्या प्रमाणात घसरला असून गेल्या काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांची मान्यता रद्द झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशात झालेल्या घसरणीमुळे विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेविषयी नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. धनंजय माने व कक्ष अधिकारी विलास दशपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार नाशिक विभागीय केंद्रांतर्गत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील ३१७ अभ्यास केंद्रावर केवळ २४ हजार ४३० प्रवेश झाले आहेत. गतवर्षी हे प्रमाण तब्बल ९० हजारांपर्यंत होते. तर मागील वर्षी विद्यापीठात जवळपास ६ लाखांहून अधिक प्रवेश नोंदवले गेले असताना यावर्षी विद्यापीठात आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांचे केवळ १ लाख ५२ हजार ८१२ प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे विविध इलेक्ट्रॉनिक माध्यातून जाहिरात बाजी करूनही विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्याप विद्यापीठ अंतर्गत प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झालेली नसून राज्यातील अन्य विद्यापीठांच्या परीक्षांचे निकालही जाहीर झालेले नसल्याने प्रवेशाच्या संख्येत घट झाली असल्याचे कारण विद्यापीठाकडून दिले जात आहे,

इन्फो-

नवीन अभ्यासक्रमांना ही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

मुक्त विद्यापीठाने मोठा गाजावाजा करीत एम. ए मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू , लोकप्रशासन यासह एमएससीचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र , वनस्पती विज्ञान, जैवविज्ञान, गणित व पर्यावरण यासारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले होते. यातील बहुतांश अभ्यासक्रमांना मर्यादित जागा उपलब्ध असतानाही यातील बहुतांश अभ्यासक्रम ही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागते आहे.

कोट-

विद्यापीठातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाही. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्यास मदत होणार आहे. प्रवेश प्रक्रियेवर कोविडचा ही परिणाम झाला आहे. मात्र येणाऱ्या काळात ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा ६ लाखांपर्यंत निश्चितच पोहोचू शकेल.

- ई वायूनंदन, कुलगुरू , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ