शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी प्रवेशाचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशाचा आलेख यावर्षी मोठ्या प्रमाणात घसरला असून गेल्या काही ...

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशाचा आलेख यावर्षी मोठ्या प्रमाणात घसरला असून गेल्या काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांची मान्यता रद्द झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशात झालेल्या घसरणीमुळे विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेविषयी नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. धनंजय माने व कक्ष अधिकारी विलास दशपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार नाशिक विभागीय केंद्रांतर्गत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील ३१७ अभ्यास केंद्रावर केवळ २४ हजार ४३० प्रवेश झाले आहेत. गतवर्षी हे प्रमाण तब्बल ९० हजारांपर्यंत होते. तर मागील वर्षी विद्यापीठात जवळपास ६ लाखांहून अधिक प्रवेश नोंदवले गेले असताना यावर्षी विद्यापीठात आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांचे केवळ १ लाख ५२ हजार ८१२ प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे विविध इलेक्ट्रॉनिक माध्यातून जाहिरात बाजी करूनही विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्याप विद्यापीठ अंतर्गत प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झालेली नसून राज्यातील अन्य विद्यापीठांच्या परीक्षांचे निकालही जाहीर झालेले नसल्याने प्रवेशाच्या संख्येत घट झाली असल्याचे कारण विद्यापीठाकडून दिले जात आहे,

इन्फो-

नवीन अभ्यासक्रमांना ही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

मुक्त विद्यापीठाने मोठा गाजावाजा करीत एम. ए मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू , लोकप्रशासन यासह एमएससीचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र , वनस्पती विज्ञान, जैवविज्ञान, गणित व पर्यावरण यासारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले होते. यातील बहुतांश अभ्यासक्रमांना मर्यादित जागा उपलब्ध असतानाही यातील बहुतांश अभ्यासक्रम ही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागते आहे.

कोट-

विद्यापीठातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाही. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्यास मदत होणार आहे. प्रवेश प्रक्रियेवर कोविडचा ही परिणाम झाला आहे. मात्र येणाऱ्या काळात ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा ६ लाखांपर्यंत निश्चितच पोहोचू शकेल.

- ई वायूनंदन, कुलगुरू , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ