शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसातून वाचविलेली द्राक्षे युरोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:14 IST

भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : पुरणगाव येथील शेतकऱ्याच्या प्रयोगाला यश; आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने समाधान

जळगाव नेऊर : भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.गणेश वरे यांनी दोन एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेऊन यावर्षी उत्कृष्ट गुणवत्तेचा माल निर्यात योग्य द्राक्ष उत्पादन घेऊन युरोप येथील बाजारपेठेत पाठविला. आपल्या शेतात सतत नवनवीन पिकांची लागवड करून नवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून गणेश वरे यांची ओळख आहे. त्यांनी शेतात कारले, भोपळे, टमाटे, मेथी, कोथिंबीर, मका, कांदे, द्राक्ष अशा विविध पिकांची लागवड करीत निरीक्षण, प्रयोग व अद्ययावत तंत्राच्या माध्यमातून शेती फुलविली आहे.इच्छाशक्तीची जोड असल्यास कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते. बाजारात मालाला दर कमी असले तरी अधिक उत्पन्न व उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर चांगला पैसा कमविता येतो. आता यापुढे आधुनिक तंत्र वापरून संधीचा शोध घेऊन योग्य पिकाची निवड करून शेतात वेगवेगळी पिके घेऊन आर्थिक प्रगती करता येईल, असे गणेश वरे सांगतात.

प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन, मीडियाचा तसेच स्थानिक कृषी सेवा केंद्रांचा सल्ला घेऊन योग्य व कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य झाले आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे फळ नक्कीच मिळते. परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेली बाग मेहनतीने सावरली असून, गुणवत्तेची द्राक्ष युरोपला निर्यात केल्याचे समाधान मिळत आहे.- गणेश वरे, द्राक्ष उत्पादक, पुरणगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती