शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

द्राक्षपंढरीत गारपीट, उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्याची द्राक्षे पंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत परिसरात शनिवार, दि. २० रोजी दुपारी साडेतीन ...

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्याची द्राक्षे पंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत परिसरात शनिवार, दि. २० रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास जोरदार गारपिटीसह अवकाळी पावसाने द्राक्ष काढणी, सोंगणीसाठी आलेले गहू, हरभरा पीक जमीनदोस्त झाले असून भाजीपाला पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह निसर्गाच्या या अस्मानी व सुलतानी संकटात उभारी घेणाआ शेतकरी पुन्हा मेटाकुटीस येणार आहे.

जिल्ह्यात द्राक्ष माल पक्व होत असताना वादळ-वारा व पाऊस तर गारपीट यामुळे द्राक्षाचे घड तुटून पडले. तर काही बागा आडव्या झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्यासह प्रतवारी बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासह वेलवर्गीय भोपळा, काकडी, कारली या पिकांना फटका बसला आहे. कांदा पिकासह सोंगणीसाठी आलेल्या गहू, हरभरा पिकाचे नुकसान वाढले आहे. या गारपिटीचा फटका पिंपळगाव, मुखेड, बेहड, पाचोरे, आहेरगाव, पाचोरे वणी, लोणवडी, पालखेड नारायण, टेम्भी आदी गावांतील भागात बसला आहे.

--------------------------

मागील संकटातून उभारी घेतो नाही तर लगेच गारपीट, पावसाने पुन्हा मेटाकुटीला आणले. होते नव्हते तेवढे गेले. आजच द्राक्ष काढणीला सुरुवात केली होती आणि गारपिटीने द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान केले. शासनाने दखल घ्यावी.

- गणेश देशमुख, द्राक्ष उत्पादक

........................

मागील अवकाळीत बागेचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण द्राक्ष बाग सडून गेली होती. त्या बागेचा तोटा दुसऱ्या बागेत भरून निघेल असे वाटत होते. त्यासाठी द्राक्ष काढणी आजपासून सुरू केली असता पॅकिंग चालू असताना पावसासह गारपीट सुरू झाली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील नुकसानाचीच प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही आणि पुन्हा आता मोठे नुकसान झाल्याने नव्याने संकट उभे राहिले आहे.

- राजेंद्र विधाते, द्राक्ष उत्पादक

--------------------------

आहेरगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश देशमुख यांच्या बागेचे झालेले हाल. (२१ पिंपळगाव २ ते ४)

---------

मातेरेवाडी परिसरात गारांचा पाऊस

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी परिसरात दुपारी आज अचानक गारांचा पाऊस पडल्याने बळीराजाला पुन्हा एकदा डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी अचानक गारांचा जोरदार पाऊस पडल्याने द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाचा जीव टांगणीला लागला आहे. पालखेड बंधाऱ्यांच्या पुढे एम.आय.डी.पासुन ते झिरो पाॅइंट, जाधव वस्ती या ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस पडला. या बेमोसमी पावसाचे आगमन अचानक झाल्याने द्राक्षे काढणीत व्यस्त असलेल्या शेतकरी वर्गाची मोठी धावपळ उडाली. तसेच द्राक्षे हंगाम मध्यावर असताना या अवेळी येणाऱ्या बेमोसमी पावसाचा बळीराजाने धसका घेतला आहे. या चिंतेत बळीराजा सापडला आहे. तालुक्यातील वरखेडा, लखमापूर, खेडगाव आदी ठिकाणी ही या बेमोसमी पावसांचे तुरळक आगमन झाल्याने आता पुढे काय, असा सवाल शेतकरी वर्गासमोर आ-वासून उभा राहिला आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी अनेक संकटांनी ग्रस्त असताना आज परत तालुक्यातील द्राक्षे पंढरीवर निर्सगाने आपली वक्रदृष्टी टाकल्याने आपली सुटका कशी होईल, या भीतीने बळीराजा चिंताक्रांत बनला आहे.

------------------------