शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

द्राक्ष, कांद्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:46 PM

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण शेतकरी धास्तावले, गव्हालाही भीती

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागणारा शेतकरी चार पैसे मिळतील या आशेत असताना ढगाळ वातावरणामुळे हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आठ ते दहा दिवसांपासून द्राक्षांची आवक घटल्याने बाजारभावात काहीशी सुधारणा झाली आहे. बेभाव विकणारी द्राक्षे किमान ३५ ते कमाल ४० रु पये विकली जात आहेत. मात्र द्राक्ष सेटिंगच्या वेळी पाऊस पडला होता. त्यामुळे गळ आणि कुज झाल्याने उत्पादन घटले आहे. पर्यायाने बाजारपेठेत द्राक्ष आवक नसल्याने दोन रुपये जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असला तरी ढगाळ वातावरणामुळे व्यापारी भाव कमी करतात किंवा अचानक पाऊस पडला तर तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.कांदा आणि गहू पीक ९० टक्के काढणीच्या प्रतीक्षेत असल्याने ढगाळ वातावरण आणि पावसाची भीती यामुळे पूर्ण वाया जाऊ शकते. कांदा नाशवंत असल्याने खराब हवामानातसुद्धा पिकावर परिणाम होतो. पात करपून जाते, शिवाय मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जमिनीत कांदा पोसत नाही त्यामुळे उत्पादनात घट होत असते. त्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काही प्रमाणात शेतात कांदा काढून टाकला आहे. साठवणीचा कालावधी पुढे असल्याने शेतात पोळ घालून पसरलेला कांदा खराब होऊ शकतो. अस्मानी, सुलतानी संकटकधी सरकारी धोरण तर कधी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयाचे सातत्याने कंबरडे मोडत आहे. वाढते कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान यांना लागणार पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.वातावरणात सतत बदल होत असल्याने शेतात कोणता शेतमाल पिकवावा आणि त्याचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. द्राक्ष, कांदा, गहू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून घेण्याची भीती वाटत आहे.- दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे