शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनुदान उपलब्ध

By admin | Updated: March 6, 2017 01:28 IST

नाशिक : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे.

 नाशिक : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. समाज कल्याण खात्याने यासंदर्भातील निर्णय घेतला असून, ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वसतिगृहात प्रवेश मिळू शकलेला नाही, असे विद्यार्थी यासाठी पात्र ठरतील.या योजनेसाठी इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात सन २०१६-१७ पासून सामाजिक न्याय विभागाने सुरू केली आहे. या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ जिल्ह्यातील (जात प्रमाणपत्र जेथून काढले आहे) सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयात दि. १६ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त काशीनाथ गवळे यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदविका या परीक्षांमध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य असून, या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा म्हणजे विद्यार्थी स्थानिक नसावा (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा) पात्र विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. जे विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाहभत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना हा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी आपले बॅँक खाते आधार कार्डाशी लिंक करून घेणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना व माहिती ँ३३स्र२://ेंँंी२ूँङ्म’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही, असेही सामाजिक न्याय विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)