शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
3
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
4
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
5
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
6
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
7
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
8
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
9
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
10
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
11
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
12
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
13
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
14
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
15
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
16
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
17
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
18
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
19
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
20
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

आजी विरुद्ध नात

By admin | Updated: February 12, 2017 00:05 IST

न्यायडोंगरी गट : लक्षवेधी लढतीकडे तालुक्याच्या नजरा

 संजीव धामणे नांदगावसध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक न्यायडोंगरी गटात रंगली आहे. एकीकडे आजी विरुद्ध नातीच्या अटी-तटीच्या होणाऱ्या लढतीत, अहेरांच्या बालेकिल्ल्यात दोघात तिसरा या न्यायाने गावच्या महिला सरपंचने आपली उमेदवारी कायम ठेवून रंग भरण्यास सुरुवात केली आहे. काय घडेल न्यायडोंगरीत हे बघणे त्यामुळे मनोरंजक ठरणारे आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. न्यायडोंगरी अन् अहेरांच्या नातेसंबंधांची वीण तशी कायम घट्ट राहिली असताना पहिल्यांदाच भाऊबंदकी उभी राहिली आहे. त्यामुळे गेलेला तडा साधणार कसा हा प्रश्न उभा राहतो, मग निकाल कोणताही लागो. गेल्या निवडणुकीत बापूसाहेब कवडे यांच्या मुलाचा तेजचा निसटत्या मतांनी पराभव करून शशिकांत मोरे या शिवसैनिकाने गणात विजय मिळविला होता. अहेरांमुळे आपला पराभव झाला ही भावना आज ही बापूसाहेबांच्या मनात घर करून आहे. मोरे यांच्या अगोदर राजाभाऊ अहेर यांनी २००२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळविला होता. त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली होती. न्यायडोंगरीत शिवसेनेच्या प्रभावाला पुढे नेण्याचे काम त्यावेळी बापूसाहेब कवडे यांनीच केले होते.न्यायडोंगरी गणात शिवसेनेच्या विद्या पाटील उमेदवारीसाठी दावेदार असताना त्यांच्याऐवजी बिरोळ्याच्या सुरेखा शेलार यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात अस्वस्थता आहे. अगोदर मोरे यांना डावलले, आता सावरगावची उमेदवारी कापली. त्यामुळे या राजकीय विरोधाभासांची परिणामकारकता कशी असेल? एकूणच न्यायडोंगरीतील लढतीला वेगळे वेगळे चढ-उतार आहेत. त्यात सर्वांच्या डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. या सर्व रणधुमाळीत गट-गणांच्या पुनर्रचनेत बापूसाहेबांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण त्यांच्या कुटुंबीयातून कोणीही रिंगणात नाही. शिवसेनेचे नेतृत्व सुहास कांदे करत असले तरी पडद्याआडचे सूत्रधार आहेत ते बापूसाहेब कवडेच. त्यांनी न्यायडोंगरीत विलास अहेर यांना देऊ केलेले समर्थन त्यामुळे महत्त्वाचे ठरते. सध्या तालुक्याच्या पातळीवर सर्वच गटांच्या पुढाऱ्यांच्या भूमिकेत सोयीस्कररीत्या होत असलेले बदल बघता एकूणच तालुकाभरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संमिश्र मानसिकतेचे वारे आहे. अनिल अहेरांनी व संजय पवारांनी स्वत:ला अनुक्रमे न्यायडोंगरी व भालूर गटापुरते मर्यादित करून घेतले आहे. राष्ट्रवादीचे मिशन पंचायत समितीपुरते आहे. जिल्ह्यातील लक्षवेधी लढत न्यायडोंगरीत होतेय हे त्यातले वैशिष्ट्य म्हणावे. ग्रामपंचायत जिंकणाऱ्या शशिकांत मोरे यांनी आपल्या पत्नी गायत्री यांना अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरवून रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजी नातीत कोण कुणावर मात करते हे बघावे लागणार आहे. नात्या-गोत्यांच्या पारंपरिकतेला साद घालीत आजी विजयाताई यांनी भावनेला हात घातलाय. आजी-नातीच्या या संघर्षाला एक किनार आहे. ती शशिकांत मोरे नावाच्या निष्ठावान शिवसैनिकाची. उणीपुरी सहा सात दशके एकहाती वर्चस्व राखणाऱ्या अहेरांच्या न्यायडोंगरीत मोरेंनी आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली ती पहिल्यांदा पाच वर्षांपूर्वी. पंचायत समितीच्या निवडणुकीत गेल्या दीड वर्षापूर्वी सरपंचपद मिळवत मोरे यांनी अहेरांना रोखले. आजी- नातीच्या सत्तासंघर्षात मोरे यांनी सहानुभूतीची किनार उभी करण्यात यश मिळवेल की नाही, या प्रश्नाने दोघा अहेरांना सतावले आहे.