शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

आजी विरुद्ध नात

By admin | Updated: February 12, 2017 00:05 IST

न्यायडोंगरी गट : लक्षवेधी लढतीकडे तालुक्याच्या नजरा

 संजीव धामणे नांदगावसध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक न्यायडोंगरी गटात रंगली आहे. एकीकडे आजी विरुद्ध नातीच्या अटी-तटीच्या होणाऱ्या लढतीत, अहेरांच्या बालेकिल्ल्यात दोघात तिसरा या न्यायाने गावच्या महिला सरपंचने आपली उमेदवारी कायम ठेवून रंग भरण्यास सुरुवात केली आहे. काय घडेल न्यायडोंगरीत हे बघणे त्यामुळे मनोरंजक ठरणारे आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. न्यायडोंगरी अन् अहेरांच्या नातेसंबंधांची वीण तशी कायम घट्ट राहिली असताना पहिल्यांदाच भाऊबंदकी उभी राहिली आहे. त्यामुळे गेलेला तडा साधणार कसा हा प्रश्न उभा राहतो, मग निकाल कोणताही लागो. गेल्या निवडणुकीत बापूसाहेब कवडे यांच्या मुलाचा तेजचा निसटत्या मतांनी पराभव करून शशिकांत मोरे या शिवसैनिकाने गणात विजय मिळविला होता. अहेरांमुळे आपला पराभव झाला ही भावना आज ही बापूसाहेबांच्या मनात घर करून आहे. मोरे यांच्या अगोदर राजाभाऊ अहेर यांनी २००२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळविला होता. त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली होती. न्यायडोंगरीत शिवसेनेच्या प्रभावाला पुढे नेण्याचे काम त्यावेळी बापूसाहेब कवडे यांनीच केले होते.न्यायडोंगरी गणात शिवसेनेच्या विद्या पाटील उमेदवारीसाठी दावेदार असताना त्यांच्याऐवजी बिरोळ्याच्या सुरेखा शेलार यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात अस्वस्थता आहे. अगोदर मोरे यांना डावलले, आता सावरगावची उमेदवारी कापली. त्यामुळे या राजकीय विरोधाभासांची परिणामकारकता कशी असेल? एकूणच न्यायडोंगरीतील लढतीला वेगळे वेगळे चढ-उतार आहेत. त्यात सर्वांच्या डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. या सर्व रणधुमाळीत गट-गणांच्या पुनर्रचनेत बापूसाहेबांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण त्यांच्या कुटुंबीयातून कोणीही रिंगणात नाही. शिवसेनेचे नेतृत्व सुहास कांदे करत असले तरी पडद्याआडचे सूत्रधार आहेत ते बापूसाहेब कवडेच. त्यांनी न्यायडोंगरीत विलास अहेर यांना देऊ केलेले समर्थन त्यामुळे महत्त्वाचे ठरते. सध्या तालुक्याच्या पातळीवर सर्वच गटांच्या पुढाऱ्यांच्या भूमिकेत सोयीस्कररीत्या होत असलेले बदल बघता एकूणच तालुकाभरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संमिश्र मानसिकतेचे वारे आहे. अनिल अहेरांनी व संजय पवारांनी स्वत:ला अनुक्रमे न्यायडोंगरी व भालूर गटापुरते मर्यादित करून घेतले आहे. राष्ट्रवादीचे मिशन पंचायत समितीपुरते आहे. जिल्ह्यातील लक्षवेधी लढत न्यायडोंगरीत होतेय हे त्यातले वैशिष्ट्य म्हणावे. ग्रामपंचायत जिंकणाऱ्या शशिकांत मोरे यांनी आपल्या पत्नी गायत्री यांना अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरवून रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजी नातीत कोण कुणावर मात करते हे बघावे लागणार आहे. नात्या-गोत्यांच्या पारंपरिकतेला साद घालीत आजी विजयाताई यांनी भावनेला हात घातलाय. आजी-नातीच्या या संघर्षाला एक किनार आहे. ती शशिकांत मोरे नावाच्या निष्ठावान शिवसैनिकाची. उणीपुरी सहा सात दशके एकहाती वर्चस्व राखणाऱ्या अहेरांच्या न्यायडोंगरीत मोरेंनी आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली ती पहिल्यांदा पाच वर्षांपूर्वी. पंचायत समितीच्या निवडणुकीत गेल्या दीड वर्षापूर्वी सरपंचपद मिळवत मोरे यांनी अहेरांना रोखले. आजी- नातीच्या सत्तासंघर्षात मोरे यांनी सहानुभूतीची किनार उभी करण्यात यश मिळवेल की नाही, या प्रश्नाने दोघा अहेरांना सतावले आहे.