शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प

By admin | Updated: May 27, 2017 23:54 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली अद्याप न झाल्याने बँक डबघाईस आली आहे. बँकेत पैसेच नसल्याने उलाढाल थांबली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली अद्याप न झाल्याने बँक डबघाईस आली आहे. बँकेत पैसेच नसल्याने उलाढाल थांबली आहे. ग्रामसेवक शिक्षक आदींसह अनेकांचे पेमेंट मिळत नाही. ग्रामपंचायतीसंबंधी पेमेंट थांबल्याने कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी अनेक जीवनावश्यक व आरोग्याशी निगडित कामांवर परिणाम झाला आहे. या संबंधात त्र्यंबकेश्वर तालुका बँकेच्या विभागीय कार्यालयास भेट दिली व बँकेची आर्थिक स्थिती खालावण्याचे कारण काय? असे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वारे वाहत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे कर्जमाफी मिळेल या आशेवर कर्ज कोणी भरण्यासाठी तयार नाही. आज त्र्यंबक तालुक्यात बँकेची सभासद संख्या ६५०० आहे. आणि या सर्वांनी कर्ज उचललेले आहे. यात ४५०० सभासद थकबाकीत गेले आहेत. बँकेची थकबाकी ६४ कोटी असून, वसुली फक्त ४ टक्के म्हणजे ४ कोटी तर व्याज ३ कोटी असे ७ कोटीच फक्त वसूल आहेत. आज ५० कोटी थकीत रक्कम असल्याने बँकेच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. बँकेत कोणताच भरणा होत नाही. वीजबिले बंद झाली आहेत. थकबाकीदारांची संख्या अजून वाढणार असून मध्यम कर्ज व अल्प मुदतीची वसुली आता सुरू होणार आहे. ७५ टक्के कर्जामध्ये द्राक्ष, ऊस आदी बागायती शेतीसाठी कर्ज दिलेले आहे. त्यामुळे या कर्जाचीदेखील थकबाकी वाढणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी बहुल असल्याने ग्रामीण भागात विखुरला आहे. आता खरिपाचा हंगाम सुरू होणार आहे. ग्रामीण आदिवासी शेतकऱ्यांना सहकारी सोसायट्यांशिवाय आधार नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे कर्जमाफीची आशा तर दुसरीकडे या आशेमुळे घेतलेले कर्ज भरले गेले नाही, वसुली होत नाही. त्यातल्या त्यात बँकेच्या जुन्या नोटा सुमारे ३५० कोटी, ज्या बदलून मिळाल्या नसल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली. आज त्र्यंबकेश्वर बँकेत कोणी कर्मचारी जागेवर दिसला नाही. एखादा दिसला असेल तर तो म्हणाला व्यवहाराच नाही तर बसून काय करणार ? सध्या बँकेने महसूल विभागामार्फत तलाठ्यांकडून थकबाकीदारांच्या सात बारा उताऱ्यावर बँकेचे नाव मोबदला करण्यास सुरु वात झाली आहे.