शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

ग्रामपंचायत सदस्यांवर आता जात पडताळणीचे गंडांतर

By admin | Updated: March 5, 2016 23:10 IST

प्रशासनाकडून समित्यांना पत्र : सदस्यांची धावपळ

 नाशिक : राखीव जागेतून ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या व निवडून आलेल्या सदस्यांसाठी सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करण्याचे बंधनकारक असताना आठ महिने उलटूनही अनेक सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने आता त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी निवडणूक शाखेने समाजकल्याण व आदिवासी विभागातील जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. राखीव जागेवर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्यांना त्यांच्या जात पडताळणी पत्र नामांकनासोबत दाखल करण्याचे बंधनकारक असले तरी, गेल्या काही वर्षांपासून जात पडताळणी समित्यांकडून वेळच्या वेळी पडताळणी करून मिळत नसल्याने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची कुचंबणा होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढून निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराने निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिली होती. (पान ७ वर)सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांचे सदस्यत्व आपोआपच संपुष्टात येण्याची तरतूद कायद्यातच करण्यात आली आहे. अर्थातच ज्यावेळी उमेदवार नामांकन दाखल करेल त्यावेळी त्याने जातीचा दाखला पडताळणी समितीकडे सुपूर्द केल्याची पावती जोडणे बंधनकारक होते. मात्र गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जिल्ह्णातील सुमारे सहाशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यात निवडून आलेल्या हजारो उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब लक्षात येताच, ग्रामपंचायत निवडणूक शाखेने समाजकल्याण खात्याच्या जात पडताळणी समिती व आदिवासी विभागाच्या समितीस पत्र पाठवून गेल्या सहा महिन्यांत कोणत्या सदस्यांची पडताळणी केली याची माहिती मागविली आहे, त्याचबरोबर सर्व तहसीलदारांना पत्र देऊन त्यांच्याकडे कोणत्या सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले त्याची माहिती उलटटपाली मागविली आहे. या माहितीतून पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांची नावे स्पष्ट होणार आहेत. त्यानंतरच त्यांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.