शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांवर आता जात पडताळणीचे गंडांतर

By admin | Updated: March 5, 2016 23:10 IST

प्रशासनाकडून समित्यांना पत्र : सदस्यांची धावपळ

 नाशिक : राखीव जागेतून ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या व निवडून आलेल्या सदस्यांसाठी सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करण्याचे बंधनकारक असताना आठ महिने उलटूनही अनेक सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने आता त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी निवडणूक शाखेने समाजकल्याण व आदिवासी विभागातील जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. राखीव जागेवर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्यांना त्यांच्या जात पडताळणी पत्र नामांकनासोबत दाखल करण्याचे बंधनकारक असले तरी, गेल्या काही वर्षांपासून जात पडताळणी समित्यांकडून वेळच्या वेळी पडताळणी करून मिळत नसल्याने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची कुचंबणा होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढून निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराने निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिली होती. (पान ७ वर)सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांचे सदस्यत्व आपोआपच संपुष्टात येण्याची तरतूद कायद्यातच करण्यात आली आहे. अर्थातच ज्यावेळी उमेदवार नामांकन दाखल करेल त्यावेळी त्याने जातीचा दाखला पडताळणी समितीकडे सुपूर्द केल्याची पावती जोडणे बंधनकारक होते. मात्र गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जिल्ह्णातील सुमारे सहाशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यात निवडून आलेल्या हजारो उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब लक्षात येताच, ग्रामपंचायत निवडणूक शाखेने समाजकल्याण खात्याच्या जात पडताळणी समिती व आदिवासी विभागाच्या समितीस पत्र पाठवून गेल्या सहा महिन्यांत कोणत्या सदस्यांची पडताळणी केली याची माहिती मागविली आहे, त्याचबरोबर सर्व तहसीलदारांना पत्र देऊन त्यांच्याकडे कोणत्या सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले त्याची माहिती उलटटपाली मागविली आहे. या माहितीतून पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांची नावे स्पष्ट होणार आहेत. त्यानंतरच त्यांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.