शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा फुटला नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 19:46 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली असून या निवडणूक प्रचाराचा नारळ नांदूरवैद्य गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर सभागृहात ग्रामपंचायत सदस्यपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत वाढविण्यात आला.

ठळक मुद्देइगतपुरी : रविवारी मतदान; दुसऱ्याच दिवशी मतमोजणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली असून या निवडणूक प्रचाराचा नारळ नांदूरवैद्य गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर सभागृहात ग्रामपंचायत सदस्यपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत वाढविण्यात आला.ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण गावागावात तापू लागले आहे. नशीब अजमावण्यासाठी व सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून भेटीगाठींना वेग आल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. निवडणुकीसाठी आरक्षण जाहिर होताच गावागावात नियोजन सुरू झाले होते. कोणता पॅनल टाकायचा? कोणता उमेदवार उभा करायचा? या संदर्भात बैठका घेऊन उमेदवार निश्चित करण्यात आले होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवार स्पष्ट झाले. त्यानंतर भेटीगाठींना वेग आला. अनेक गावांमध्ये सध्या नारळ फुटला असून प्रचाराला वेग येत आहे. उमेदवारासह कार्यकर्ते देखील प्रचार करतांना पहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस प्रचाराला उमेदवार गती देतांना दिसून येत असून मतदारांमध्येही मतदानाची उत्सुकता पहावयास मिळत आहे. निवडणुकीची कुठलीही माहिती नसतांना या प्रचारफेरीमध्ये लहान लहान मुले देखील पञके वाटतांना आनंद घेत आहेत. नांदूरवैद्य व बेलगाव या दोन्हीही गावातील उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु असून मतदान रविवारी (दि.२४) रोजी होणार असून या निवडणुकीचा निकाल दुसऱ्याच दिवशी सोमवारी (दि.२५) रोजी इगतपुरी येथील नवीन शासकीय इमारतीत होणार आहे. या दिवशी रंगपंचमी असल्याने कोणाच्या अंगावर गुलाल पडणार हे पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून पुर्ण तयारी झाली आहे. तसेच सर्व यंत्रसामुग्रीची देखील जुळवाजुळव केली आहे. गावातील सर्व उमेदवारांनी प्रचाराचा नारळ वाढविल्यानंतर संपुर्ण गावातुन प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीला ग्रामस्थांचार् प्रतिसाद लाभला आहे.