शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा फुटला नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 19:46 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली असून या निवडणूक प्रचाराचा नारळ नांदूरवैद्य गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर सभागृहात ग्रामपंचायत सदस्यपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत वाढविण्यात आला.

ठळक मुद्देइगतपुरी : रविवारी मतदान; दुसऱ्याच दिवशी मतमोजणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली असून या निवडणूक प्रचाराचा नारळ नांदूरवैद्य गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर सभागृहात ग्रामपंचायत सदस्यपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत वाढविण्यात आला.ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण गावागावात तापू लागले आहे. नशीब अजमावण्यासाठी व सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून भेटीगाठींना वेग आल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. निवडणुकीसाठी आरक्षण जाहिर होताच गावागावात नियोजन सुरू झाले होते. कोणता पॅनल टाकायचा? कोणता उमेदवार उभा करायचा? या संदर्भात बैठका घेऊन उमेदवार निश्चित करण्यात आले होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवार स्पष्ट झाले. त्यानंतर भेटीगाठींना वेग आला. अनेक गावांमध्ये सध्या नारळ फुटला असून प्रचाराला वेग येत आहे. उमेदवारासह कार्यकर्ते देखील प्रचार करतांना पहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस प्रचाराला उमेदवार गती देतांना दिसून येत असून मतदारांमध्येही मतदानाची उत्सुकता पहावयास मिळत आहे. निवडणुकीची कुठलीही माहिती नसतांना या प्रचारफेरीमध्ये लहान लहान मुले देखील पञके वाटतांना आनंद घेत आहेत. नांदूरवैद्य व बेलगाव या दोन्हीही गावातील उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु असून मतदान रविवारी (दि.२४) रोजी होणार असून या निवडणुकीचा निकाल दुसऱ्याच दिवशी सोमवारी (दि.२५) रोजी इगतपुरी येथील नवीन शासकीय इमारतीत होणार आहे. या दिवशी रंगपंचमी असल्याने कोणाच्या अंगावर गुलाल पडणार हे पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून पुर्ण तयारी झाली आहे. तसेच सर्व यंत्रसामुग्रीची देखील जुळवाजुळव केली आहे. गावातील सर्व उमेदवारांनी प्रचाराचा नारळ वाढविल्यानंतर संपुर्ण गावातुन प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीला ग्रामस्थांचार् प्रतिसाद लाभला आहे.