शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शासनाचे जलयुक्त शिवार अभियान त्र्यंबकच्या १८ गावांचा समावेश

By admin | Updated: March 3, 2015 00:52 IST

शासनाचे जलयुक्त शिवार अभियान त्र्यंबकच्या १८ गावांचा समावेश

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकला पाण्याचे स्त्रोत कायम राहावेत यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात १८ गावांचा समावेश आहे. समितीमार्फत जमिनीत कायम ओलावा राहावा यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करणे सुरू आहे. यामध्ये दगडी बांध, शेततळे, वनतळे, सीमेंट बंधारे, वृक्ष लागवड (सामाजिक वनीकरण अंतर्गत) आदि उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.त्र्यंबकला त्यानुसार एक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार निधी खर्च करण्यात येणार आहे. तथापि अद्यापपावेतो निधी आलेला नाही. आराखडा मंजूर झाला म्हणजे निधी मंजूर करणे होय. यासाठी सुमारे २२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.मंजूर आराखड्याप्रमाणे भागओहळ, बेळे, देवडोंगरा, देवडोंगरी, तोरंगण (हरसूल) कळमुले (त्र्यंबकेश्वर), कळमुले (त्र्यंबक), ब्राह्मणवाडे, गणेशगाव, मुळेगाव, हिरडी, खरशेत, सामुंडी, देवगाव, टाके देवगाव, गावठा, मुरंबी, ठाणापाडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची नुकतीच बैठक प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सचिव तालुका कृषी अधिकारी अभय फलके, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी प्रमिला जाखलेकर, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन (जलसंधारण विभाग - जि. प. नाशिक), भुजल सर्वेक्षण व जलसंपादन विभाग आदि यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समिती सदस्य म्हणून समावेश आहे. या सदस्यांनी सर्व कामांची पाहणी करून कामे पूर्ण करून घ्यायची आहेत.(वार्ताहर)