शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पदवीधरमध्ये ठरणार सरकारचे भवितव्य

By admin | Updated: January 23, 2017 00:39 IST

भालचंद्र कानगो : विधान परिषद निवडणूक प्रचारसभेत प्रतिपादन

नाशिक : विधान परिषद निवडणुकीतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील मतदार शिक्षित असल्याने त्यांना सरकारच्या धोरणांच्या परिणामांचे चांगले-वाईट परिणाम कळू शकतात. त्यामुळे नाशिक विभागातील निवडणूक सत्ताबदलाची नव्हे, तर केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय्य-धोरणांचा जय-पराजय ठरविणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.  गोळे कॉलनीतील गद्रे मंगल कार्यालयात नाशिक पदवीधर मतदारसंघातील डाव्या आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, प्रा. के. एस. अहिरे, राजू देसले, डॉ. दत्ता निकम आदि उपस्थित होते. कानगो यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावर कराच्या माध्यमातून कर्ज उभारणाऱ्या असल्याचा आरोप केला. सरकार विकासाचे भ्रामक चित्र निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगत सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. राज्यात बुलेट ट्रेन, मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी मार्ग प्रकल्पांच्या माध्यमातून विकास होत असल्याचे सांगितले जाते. परंतु नागपूर-मुंबई असे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग असे दोन मार्ग असताना केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी ५० हजार कोटी खर्चून समृद्धी महामार्गाचा घाट घालणे व नागपूरसारख्या शहरात मेट्रोसाठी १२ हजार कोटींचा खर्च कराच्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांनाच भरावा लागणार आहे. देशात सर्वाधिक वाहतूक मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर असताना ७० हजार कोटी खर्चून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट कशासाठी, असा सवालही कानगो यांनी उपस्थित केला. सरकारच्या या भ्रामक धोरणांनी शिक्षित मतदारांनी ओळखले असून, या विधान परिषद निवडणुकांमध्ये हा सुशिक्षित मतदार सरकारच्या धोरणाचे यशापयश ठरविणार असल्याचे मत कानगो यांनी व्यक्त केले. दरम्यान प्रतिभा शिंदे यांनीही काँग्रेस आणि भाजपाला टीकेचे लक्ष्य  केले. (प्रतिनिधी)