शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

पदवीधरमध्ये ठरणार सरकारचे भवितव्य

By admin | Updated: January 23, 2017 00:39 IST

भालचंद्र कानगो : विधान परिषद निवडणूक प्रचारसभेत प्रतिपादन

नाशिक : विधान परिषद निवडणुकीतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील मतदार शिक्षित असल्याने त्यांना सरकारच्या धोरणांच्या परिणामांचे चांगले-वाईट परिणाम कळू शकतात. त्यामुळे नाशिक विभागातील निवडणूक सत्ताबदलाची नव्हे, तर केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय्य-धोरणांचा जय-पराजय ठरविणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.  गोळे कॉलनीतील गद्रे मंगल कार्यालयात नाशिक पदवीधर मतदारसंघातील डाव्या आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, प्रा. के. एस. अहिरे, राजू देसले, डॉ. दत्ता निकम आदि उपस्थित होते. कानगो यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावर कराच्या माध्यमातून कर्ज उभारणाऱ्या असल्याचा आरोप केला. सरकार विकासाचे भ्रामक चित्र निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगत सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. राज्यात बुलेट ट्रेन, मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी मार्ग प्रकल्पांच्या माध्यमातून विकास होत असल्याचे सांगितले जाते. परंतु नागपूर-मुंबई असे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग असे दोन मार्ग असताना केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी ५० हजार कोटी खर्चून समृद्धी महामार्गाचा घाट घालणे व नागपूरसारख्या शहरात मेट्रोसाठी १२ हजार कोटींचा खर्च कराच्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांनाच भरावा लागणार आहे. देशात सर्वाधिक वाहतूक मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर असताना ७० हजार कोटी खर्चून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट कशासाठी, असा सवालही कानगो यांनी उपस्थित केला. सरकारच्या या भ्रामक धोरणांनी शिक्षित मतदारांनी ओळखले असून, या विधान परिषद निवडणुकांमध्ये हा सुशिक्षित मतदार सरकारच्या धोरणाचे यशापयश ठरविणार असल्याचे मत कानगो यांनी व्यक्त केले. दरम्यान प्रतिभा शिंदे यांनीही काँग्रेस आणि भाजपाला टीकेचे लक्ष्य  केले. (प्रतिनिधी)