शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरमध्ये ठरणार सरकारचे भवितव्य

By admin | Updated: January 23, 2017 00:39 IST

भालचंद्र कानगो : विधान परिषद निवडणूक प्रचारसभेत प्रतिपादन

नाशिक : विधान परिषद निवडणुकीतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील मतदार शिक्षित असल्याने त्यांना सरकारच्या धोरणांच्या परिणामांचे चांगले-वाईट परिणाम कळू शकतात. त्यामुळे नाशिक विभागातील निवडणूक सत्ताबदलाची नव्हे, तर केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय्य-धोरणांचा जय-पराजय ठरविणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.  गोळे कॉलनीतील गद्रे मंगल कार्यालयात नाशिक पदवीधर मतदारसंघातील डाव्या आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, प्रा. के. एस. अहिरे, राजू देसले, डॉ. दत्ता निकम आदि उपस्थित होते. कानगो यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावर कराच्या माध्यमातून कर्ज उभारणाऱ्या असल्याचा आरोप केला. सरकार विकासाचे भ्रामक चित्र निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगत सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. राज्यात बुलेट ट्रेन, मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी मार्ग प्रकल्पांच्या माध्यमातून विकास होत असल्याचे सांगितले जाते. परंतु नागपूर-मुंबई असे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग असे दोन मार्ग असताना केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी ५० हजार कोटी खर्चून समृद्धी महामार्गाचा घाट घालणे व नागपूरसारख्या शहरात मेट्रोसाठी १२ हजार कोटींचा खर्च कराच्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांनाच भरावा लागणार आहे. देशात सर्वाधिक वाहतूक मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर असताना ७० हजार कोटी खर्चून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट कशासाठी, असा सवालही कानगो यांनी उपस्थित केला. सरकारच्या या भ्रामक धोरणांनी शिक्षित मतदारांनी ओळखले असून, या विधान परिषद निवडणुकांमध्ये हा सुशिक्षित मतदार सरकारच्या धोरणाचे यशापयश ठरविणार असल्याचे मत कानगो यांनी व्यक्त केले. दरम्यान प्रतिभा शिंदे यांनीही काँग्रेस आणि भाजपाला टीकेचे लक्ष्य  केले. (प्रतिनिधी)