शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण क्षेत्रातील संशोधनावर सरकारचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:29 IST

नाशिक : गेल्या साठ वर्षांत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्याकडे रशियन बनावटीच्या टॅँकचे उत्पादन घेतले जाते; परंतु टॅँक नादुरुस्त झाला तर त्याच्या स्पेअरपार्टसाठी रशियाकडे हात पसरावे लागतात. त्यामुळे २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर संशोधनावर भर देण्यात आला.

ठळक मुद्देसुभाष भामरे : ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत साधला मनमोकळा संवाद

 

नाशिक : गेल्या साठ वर्षांत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्याकडे रशियन बनावटीच्या टॅँकचे उत्पादन घेतले जाते; परंतु टॅँक नादुरुस्त झाला तर त्याच्या स्पेअरपार्टसाठी रशियाकडे हात पसरावे लागतात. त्यामुळे २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर संशोधनावर भर देण्यात आला. आता शस्त्रास्त्रनिर्मितीत सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीच्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत बोलताना स्पष्ट केले. भामरे यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रातील सज्जतेची ग्वाही देताना राफेलवरून उठलेल्या गदारोळाविषयी विरोधकांनाच लक्ष्य केले. विरोधकांच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.डॉ. सुभाष भामरे यांनी अंबड एमआयडीसीतील ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी, लोेकमत नाशिक आवृत्तीच्या संपादकीय सल्लागार समिती सदस्यांबरोबरच लोकमतच्या महाराष्टÑातील अन्य सर्व आवृत्तीच्या संपादकांसमवेतही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी डॉ. भामरे यांनी संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विषयांबरोबरच आपल्या धुळे मतदारसंघातील नार-पार प्रकल्प, सिंचनाच्या सुविधांपर्यंत उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. डॉ. भामरे यांनी सांगितले, आंतरराष्टÑीय स्तरावर केवळ व्यापारी तत्त्वावर मैत्री असते. कुणीही आपले तंत्रज्ञान देत नाही. आता अत्याधुनिक शस्त्रास्त्रे येत आहेत. भविष्यातील युद्ध हे ४८ तासांपेक्षा अधिक काळ चालणार नाही. शेजारील देश न्यूक्लिअर पॉवरने सिद्ध आहेत. त्यामुळेच आमच्या सरकारची जबाबदारी वाढली असल्याचेही भामरे यांनी सांगितले. यावेळी, संपादकीय सल्लागार समिती सदस्यांनीही उपस्थित केलेल्या प्रश्नांना डॉ. भामरे यांनी उत्तरे दिली. तत्पूर्वी, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी डॉ. भामरे यांचे स्वागत केले. यावेळी, संपादकीय सल्लागार समितीचे सदस्य सर्वश्री प्रा. दिलीप फडके, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, डॉ. गिरधर पाटील, कॉम्रेड श्रीधर देशपांडे, ज्येष्ठ वास्तुविशारद अरुण काबरे, प्राचार्य डॉ. किशोर पवार, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीधर माने, सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कवी किशोर पाठक, सनदी लेखापाल तुषार पगार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी आणि अंनिसचे पदाधिकारी महेंद्र दातरंगे आदी उपस्थित होते. सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी आभार मानले.नाशकात डिफेन्स इनोव्हेशन हबभारतात लघु उद्योजकांना संरक्षण सेक्टरमधून प्रोत्साहन मिळावे, त्या माध्यमातून एक डिफेन्स इको सिस्टीम तयार व्हावी याकरिता भारत सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी डिफेन्स इनोव्हेशन हब स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, कोइम्बतूर नंतर आता नाशकात हे हब येत्या २२ डिसेंबरला कार्यान्वित केले जाणार असल्याची घोषणाही भामरे यांनी केली. याचवेळी, ओझर येथील एचएएलला १ लाख कोटींची आॅर्डर असून, त्यांना काम दिले जात नसल्याच्या केवळ अफवा असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले. एचएएलने २०१० पर्यंत केवळ ७ लढाऊ विमाने बनविली. वस्तुत: एका वर्षात ८ लढाऊ विमाने बनविण्याची क्षमता आहे. मात्र, आता वर्षाला २४ विमाने बनविण्याचे लक्ष्य आहे. आपलं पोरगं कसंही असलं तरी त्याचं कौतुक करावं लागतं. त्यामुळे एचएएलला कुपोषित होऊ देणार नसल्याची ग्वाहीही डॉ. भामरे यांनी दिली. राफेलबाबत विरोधकांचा समाचारसंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राफेल विमानावरून उठलेल्या वादळाबाबत विरोधकांचा समाचार घेतला. राहुल गांधी हे रोज वेगवेगळी माहिती देत आहेत; परंतु त्यात कुठलेही तथ्य नाही. त्यांच्याच सरकारच्या काळात निविदाप्रक्रिया राबविली गेली तर त्याचवेळी त्यांनी करार का रद्द केला नाही, असा सवालही भामरे यांनी केला. रिलायन्सला ३० हजार कोटी दिल्याचाही त्यांनी इन्कार करत ७२ कंपन्यांपैकी एक रिलायन्स कंपनी असून, त्यांना नागपूरसाठी केवळ दीड हजार कोटीचेच काम दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागच्या काळातमौनी बाबादिल्लीत महाराष्टÑाची बाजू मांडण्यात महाराष्टÑाचे खासदार कमी पडत असल्याची टीका होत असते, त्याबद्दल भामरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही गोष्ट मागच्या काळातील असल्याचे सांगत आता कुणीही मौनी बाबा नसल्याचे स्पष्ट केले. दिल्लीत दर महिन्याला सर्व खासदार आणि अधिकारी एकत्र बसतात आणि त्यांच्यात समन्वय होऊन चर्चा होत असल्याने त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही भामरे यांनी सांगितले.