शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

सरकारचं चुकलं...! आमचा दोष काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:12 IST

तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

नाशिक : तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.  सातवा वेतन आयोग लागू करून सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक-वाहकांना आर्थिक सुबत्ता मिळवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो चालक-वाहकांनी मंगळवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून संप पुकारला. यामुळे दिवसभर प्रवाशांचे हाल झाले. बसस्थानकांना जणू आगाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोठ्या संख्येने बसेसच्या रांगा लागल्या होत्या. खासगी ट्रॅव्हल्सचा आधार नागरिकांना शहराबाहेर जाण्यासाठी घ्यावा लागला. यावेळी अव्वाच्या सव्वा दराच्या आकारणीचा धोका वाढला होता; मात्र प्रादेशिक परिवहन विभाग, महामंडळ व चौधरी यात्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने एसटी भाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी भाड्यात प्रवासी वाहतूक उपलब्ध झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला. सकाळपासूनच संपाची धार तीव्र असल्यामुळे दिवसभर नागरिकांची विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व पासधारकांची मोठी गैरसोय झाली. सरकारने तातडीने तोडगा काढून एस.टी. कर्मचाºयांचा संप मिटवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली  आहे.  दिवाळीच्या हंगामात ‘एसटी’ची डबल बेल पडली नाही तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संप मिटविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.मी नेवासा येथे मूळगावी जाण्यासाठी दोन तासांपासून महामार्गावर थांबून राहिलो; मात्र उपयोग झाला नाही. सरकारने संप सणासुदीचा काळ लक्षात घेऊन टाळायला हवा होता. सरकारची भूमिका चुकली.  - नीलेश वाघमारेदीड तास झाला वसईला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होते. संप असल्याचे माहिती नाही; मुलीलाही काळजी लागून आहे. कर्मचाºयांनी संयम दाखवावा, तर सरकारने संप लवकर मिटवावा. -मालतीबाई वसईकरकामगारांनी संप पुकारला ते त्यांच्या जागी योग्य आहेत व नागरिकाही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. सरकारने सणासुदीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून संपाबाबत तोडगा काढायला हवा.  - ऐश्वर्या बागुल