शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सरकारचं चुकलं...! आमचा दोष काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:12 IST

तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

नाशिक : तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.  सातवा वेतन आयोग लागू करून सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक-वाहकांना आर्थिक सुबत्ता मिळवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो चालक-वाहकांनी मंगळवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून संप पुकारला. यामुळे दिवसभर प्रवाशांचे हाल झाले. बसस्थानकांना जणू आगाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोठ्या संख्येने बसेसच्या रांगा लागल्या होत्या. खासगी ट्रॅव्हल्सचा आधार नागरिकांना शहराबाहेर जाण्यासाठी घ्यावा लागला. यावेळी अव्वाच्या सव्वा दराच्या आकारणीचा धोका वाढला होता; मात्र प्रादेशिक परिवहन विभाग, महामंडळ व चौधरी यात्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने एसटी भाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी भाड्यात प्रवासी वाहतूक उपलब्ध झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला. सकाळपासूनच संपाची धार तीव्र असल्यामुळे दिवसभर नागरिकांची विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व पासधारकांची मोठी गैरसोय झाली. सरकारने तातडीने तोडगा काढून एस.टी. कर्मचाºयांचा संप मिटवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली  आहे.  दिवाळीच्या हंगामात ‘एसटी’ची डबल बेल पडली नाही तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संप मिटविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.मी नेवासा येथे मूळगावी जाण्यासाठी दोन तासांपासून महामार्गावर थांबून राहिलो; मात्र उपयोग झाला नाही. सरकारने संप सणासुदीचा काळ लक्षात घेऊन टाळायला हवा होता. सरकारची भूमिका चुकली.  - नीलेश वाघमारेदीड तास झाला वसईला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होते. संप असल्याचे माहिती नाही; मुलीलाही काळजी लागून आहे. कर्मचाºयांनी संयम दाखवावा, तर सरकारने संप लवकर मिटवावा. -मालतीबाई वसईकरकामगारांनी संप पुकारला ते त्यांच्या जागी योग्य आहेत व नागरिकाही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. सरकारने सणासुदीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून संपाबाबत तोडगा काढायला हवा.  - ऐश्वर्या बागुल