शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचं चुकलं...! आमचा दोष काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:12 IST

तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

नाशिक : तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.  सातवा वेतन आयोग लागू करून सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक-वाहकांना आर्थिक सुबत्ता मिळवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो चालक-वाहकांनी मंगळवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून संप पुकारला. यामुळे दिवसभर प्रवाशांचे हाल झाले. बसस्थानकांना जणू आगाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोठ्या संख्येने बसेसच्या रांगा लागल्या होत्या. खासगी ट्रॅव्हल्सचा आधार नागरिकांना शहराबाहेर जाण्यासाठी घ्यावा लागला. यावेळी अव्वाच्या सव्वा दराच्या आकारणीचा धोका वाढला होता; मात्र प्रादेशिक परिवहन विभाग, महामंडळ व चौधरी यात्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने एसटी भाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी भाड्यात प्रवासी वाहतूक उपलब्ध झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला. सकाळपासूनच संपाची धार तीव्र असल्यामुळे दिवसभर नागरिकांची विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व पासधारकांची मोठी गैरसोय झाली. सरकारने तातडीने तोडगा काढून एस.टी. कर्मचाºयांचा संप मिटवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली  आहे.  दिवाळीच्या हंगामात ‘एसटी’ची डबल बेल पडली नाही तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संप मिटविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.मी नेवासा येथे मूळगावी जाण्यासाठी दोन तासांपासून महामार्गावर थांबून राहिलो; मात्र उपयोग झाला नाही. सरकारने संप सणासुदीचा काळ लक्षात घेऊन टाळायला हवा होता. सरकारची भूमिका चुकली.  - नीलेश वाघमारेदीड तास झाला वसईला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होते. संप असल्याचे माहिती नाही; मुलीलाही काळजी लागून आहे. कर्मचाºयांनी संयम दाखवावा, तर सरकारने संप लवकर मिटवावा. -मालतीबाई वसईकरकामगारांनी संप पुकारला ते त्यांच्या जागी योग्य आहेत व नागरिकाही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. सरकारने सणासुदीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून संपाबाबत तोडगा काढायला हवा.  - ऐश्वर्या बागुल