शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

वेदाच्या समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील

By admin | Updated: March 28, 2015 00:49 IST

शास्त्री : वेद विद्या प्रतिष्ठानचा सन्मान सोहळा

  नाशिक : देशभरातील वेद केद्रांना ऊर्जितावस्था देण्यासाठी त्यांच्या समृद्धीसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठानचे सचिव डॉ. रूपकिशोर शास्त्री यांनी केले.शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती महायाग व विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. शास्त्री म्हणाले की, देशभरातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सेवाभावाच्या हेतूने प्रेरित व्हायला हवे. कारण विविध धर्मांच्या लोकांची जीवनशैली जरी वेगळी असली तरी, त्यांचे मन एकत्र आणण्याची किमया वेदांच्या साहाय्याने सहज साध्य करता येऊ शकते. ‘यत्र विश्वम् भवते एक निडम’ याप्रमाणे सर्व जातीधर्माच्या लोकांचा भाव एकच असतो. त्यातच वैदिक वाङ्मयात त्याच लोकांची पूजा होत असते, जे प्रगतीचा मार्ग निवडतात. दुसऱ्याच्या दु:खाला स्वत:चे दु:ख समजणाऱ्यालाच वेदात खरा संत म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश खैरनार (उद्योग), दीपक ठुबे (शेती), परवीन शेख (दिशा महिला संघटना), गणेश सूर्यवंशी (शिक्षण), अलीम पिरजादा (सामाजिक), अंबादास गांगुर्डे (जनसाथी सामाजिक संस्था), शरद शेजवळ (शाहीर), प्रकाश शेवाळे (पक्षिप्रेमी), लक्ष्मीकांत जोशी (आध्यात्मिक) आदिंचा विविध क्षेत्रांत योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, हिंदू मध्यवर्ती सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, स्वामी भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विश्वास देवकर, शांताराम भानोसे, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पैठणे, प्रधानाचार्य रवींद्र पैठणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)