शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

शासनाकडून मागण्या मान्य करून घेणार

By admin | Updated: June 26, 2017 00:41 IST

स्वामीनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या शासनाच्या मानगुटीवर बसून मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला /पिंपळगाव बसवंत : दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी केली म्हणजे सर्व काही झाले असे सरकारने समजू नये. अन्य शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी कर्ज मर्यादेत वाढ करावी, जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा त्यात समावेश करावा, शेतमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या आम्ही शासनाच्या मानगुटीवर बसून मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील येवला, पिंपळगाव बसवंत, निफाड येथील दौऱ्याप्रसंगी दिली.कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवसेनेतर्फे रविवारी येवला शहरातील आसरा लॉन्स येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओझरपासून येवल्यापर्यंतच्या पट्ट्यातील शेतकरी आंदोलनाच्यावेळी रस्त्यावर उतरला आणि सरकारला आपली ताकद दाखवून दिली. या एकजुटीच्या जोरावर सरकार झुकले. म्हणूनच या बहादूर शेतकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे. कर्जमाफीचा नाशिक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यात असंतोष आहे याची आपणास जाणीव आहे. असेही ते म्हणाले. सरकारने मार्च २०१६ पर्यंतच्या कर्जाबाबत निर्णय घेतला. पण मार्च २०१७ अखेरच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यास सरकारला आम्ही भाग पाडू. केवळ कर्जमुक्ती नाही तर, कांदा पिकासह अन्य शेतमालाला हमी भाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी करणे महत्वाचे असून शासनाला ती करावीच लागेल असेही ठाकरे यांनी नमूद केले.  यावेळी व्यासपीठावर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, संभाजी पवार यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित होते. प्रास्तविक दराडे यांनी तर स्वागत पवार यांनी केले.कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख वाल्मिक गोरे, तालुका प्रमुख झुंजार देशमुख, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, कुणाल दराडे, माजी नगरसेवक संजय कासार बाळासाहेब पिंपरकर, कांतीलाल साळवे, पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे, छगन आहेर, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड मंगेश भगत, साहेबराव सैद, रतन बोरनारे, यांच्यासह शिवसैनिक व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरकारला जाब विचारा च्दुष्काळाने जर्जर झालेला शेतकरी गारपिटीत सापडला, त्यानंतर नोटाबंदीच्या फंड्यात शेतकऱ्यांची रोकड थांबली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. जिल्हा बँकेत राजकारण आणून चेअरमन नरेंद्र दराडे यांना केवळ बदनाम केले गेले. चुका झाल्या असतील तर त्यांना पकडण्याची हिंमत दाखवा असे सांगतानाच जिल्हा बँकेत पडून राहिलेल्या पैशांचे व्याज कोण देणार? याचा जाब सरकारला विचारण्याचा आदेशच उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र दराडे यांना भाषणातून दिला. शेतकरी गुन्हेगार असतील तर सेना त्यांच्यासोबतच !शेतकऱ्यांना जर गुन्हेगार ठरवणार असाल तर, याच गुन्हेगारांबरोबर सेना आहे. पिंपळगावसह अन्य भागात झालेल्या शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे न घेतल्यास सेनेचा हिसका दाखवू असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांची यादीच सभेत मागवून ही यादी सरकारकडून रद्द करून घेणारच असा शब्द सभेत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. सरकार सरळ न्याय देणार नसेल तर, दुसरी भाषा बोलावी लागेल. न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच सेना आहे हा बाळासाहेबांचा शब्द खरा करवून दाखविण्याची गर्जनाही ठाकरे यांनी सभेत केली.