शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

गोदावरी नदीवरील पुलांना शासनाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:13 IST

नाशिक- गंगापूररोडवर गोदावरी नदीवरील अगोदरच्या दोन पुलांचा पुरेसा वापर होत नसताना आता आणखी पूल बांधण्याचा घाट सत्तारूढ भाजपने घातला ...

नाशिक- गंगापूररोडवर गोदावरी नदीवरील अगोदरच्या दोन पुलांचा पुरेसा वापर होत नसताना आता आणखी पूल बांधण्याचा घाट सत्तारूढ भाजपने घातला असून त्यास चव्हाण कॉलनी येथील रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. आता राज्य शासनाने या पुलास गुरुवारी (दि.२४) स्थगिती दिली आहे. आक्षेप घेणाऱ्यांना रीतसर सुनावणी देऊन मग त्यावर शासन निर्णय घेणार आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कार्यवाही केली आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात दाखल याचिकेत गेल्या १७ डिसेंबर रोजी निकाल दिला आहे. न्यायमूर्ती एस.जे. काथावाला आणि छागला यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाने महापालिका आयुक्तांना यासंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर नगरविकास मंत्री सुनावणी घेणार आहेत. तोपर्यंत पुलाच्या कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. कक्ष आधिकारी सु.द.धांडे यांनी यासंदर्भात गुरूवारी (दि.२४)महापालिकेला पत्र पाठवले आहे.

गोदावरी नदीवर आसाराम बापु आश्रमाजवळील पुल आणि त्यानंतर फॉरेस्ट नर्सरी पुल आणि त्याही पुुढे इंद्रप्रस्थ पुल असून आता या तीन पुलांच्या जोडीला आणखी तीन पुल बांधण्याचे घाटत आहे. या मार्गावर केाणतीही रहदारी नाही की तशी स्थानिकांची मागणी देखील नाही असे असताना देखील हा पुल बांधण्याचे घाटत असल्याने त्यावरून बराच वाद निर्माण झाला. महापालिकेत भाजपची सत्ता असताना देखील आमदार देवयानी फरांदे यांनी या पुलास विरोध केला आणि या पुलामुळे नदीप्रवाहास अडथळा हेाणार असून पुराचा धेाका कमी होण्यापेक्षा अधिकच वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतरही पुल मंजुर करून निविदा मागवण्यात आल्या. त्यानंतर स्थानिक रहीवाशांनी त्यास विरोध केला होता. संबंधीत नागरीकांच्या वतीने प्रकाश दादासाहेब सानप यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्याच अनुषंघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

इन्फो...

काय आहे रहिवाशांचा आक्षेप?

१ नदीवर अगोदरच तीन पुला आहेत. त्यात आणखी पुल बांधल्यास गोदावरी नदीची पूरपातळी वाढणार आहे. त्याचा नदीकाठच्या घरांना धोका असून नागरिकांच्या घरात पाणी शिरू शकते.

२ पंधरा मीटर पुलाला मनपाने तीस मीटर केले, त्यानंतर निविदा काढताना आठ मीटर पूल दर्शवला. त्यामुळे एकूणच कामात तांत्रिक गेांधळ आहे.

३ या पुलालगतचा रस्ताही चुकीचा आहे. तीस मीटर रस्त्याला झेड असे वळण देण्यात आले असून, तेदेखील अत्यंत धोकादायक आहे.