शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

ग्रामीण भागाचे सरकारला वावडे

By admin | Updated: October 30, 2016 01:42 IST

चणाडाळीपासून वंचित : शहरी नागरिकांनाच प्राधान्य

नाशिक : ऐन सणासुदीत चणाडाळीचे भाव आकाशाला भिडल्याने शहरी भागातील निवडक नागरिकांसाठी ७० रुपये प्रती किलो दराने खुल्या बाजारात चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेऊन एक प्रकारे ग्रामीण भागातील नागरिकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे दिवाळीत ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी चणाडाळीचे चकल्या, शेव करून खाऊ नाही असेच बहुधा सरकारला वाटत असावे.  मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या मुख्य शहरांतील नागरिकांसाठी खुल्या बाजारात ७० रुपये दराने चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला ७०० मेट्रिक टन चणाडाळ दिली असून, राज्य सरकारने या चणाडाळीची भरडाई, पॅकिंग करून या प्रमुख शहरातील शासकीय गुदामात पोहोचविण्यासाठी वाहतूक ठेकेदार नेमण्याची कार्यवाही सुरू केली आहे.  खुल्या बाजारात म्हणजेच रेशन दुकानातून प्रत्येकी एक किलो वजनाचे पॅकेट ७० रुपये या दराने चणाडाळ विक्री केली जाणार असून, ग्राहकांना हवी तितकी चणाडाळ खरेदी करता येणार आहे. ही सुविधा फक्त शहरी भागातील नागरिकांसाठीच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरवठा खात्याच्या म्हणण्यानुसार खुल्या बाजारात म्हणजेच रेशनवर चणाडाळ विक्रीसाठी आल्यावर त्याचा परिणाम खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी असलेल्या चणाडाळीच्या दरावर होणार आहे. सामान्य ग्राहकांना रेशनवर ७० रुपयांत चणाडाळ मिळाल्यास व्यापाऱ्यांकडील चणाडाळीला ग्राहक राहणार नाही, असे गृहीतक पुरवठा विभाग मांडत असले तरी, चणाडाळीचे दर घसरल्यास म्हणजेच ७० रूपयांपेक्षा खाली आल्यास रेशनमधून विक्री केल्या जाणाऱ्या चणाडाळीलाही ग्राहक मिळणार नसल्याचा दावा केला जात आहे. रेशन दुकानदारच साशंकयाबाबत रेशन दुकानदारच साशंक असून, त्यांच्यासमोर तुरडाळीचा अनुभव अजूनही ताजा आहे. तुरडाळीबाबत शासनाने अशाच प्रकारचे धोरण स्वीकारले, परंतु रेशनवरील व खुल्या बाजारातील तुरडाळीचे दर समान पातळीवर आल्यानंतर ग्राहकांनी रेशनच्या तुरडाळीकडे पाठ फिरविली होती. हा सारा इतिहास लक्षात घेता, शासनाने फक्त शहरी भागातच चणाडाळ पुरविण्याचा निर्णय घेतला परंतु त्यातून ग्रामीण भागावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.