शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:58 IST

समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार गिरीश महाजन : महामार्ग होणारच

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार असून, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शेतकऱ्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील नागपूरपासून शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे होत समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास सुरुवात केली आहे. अन्य भागातूनही या महामार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या समृद्धी महामार्गाला असलेल्या विरोधाकडे महाजन यांचे लक्ष वेधले असता, नाशिक जिल्ह्णासाठी अलीकडेच जमिनींचे दर जाहीर करण्यात आले असून, त्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्यात आले आहेत. अन्य प्रकल्पांसाठी अगोदर सरकारकडून जमीन संपादित केली जात व नंतर शेतकऱ्यांना दहा, पंधरा वर्षांनंतर मोबदला मिळत होता परंतु या महामार्गासाठी थेट खरेदीने शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार आहे व त्याचा मोबदलाही तत्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे काही प्रश्न असतील तर सरकारकडे चर्चेसाठी यावे सरकार चर्चेला तयार आहे असे सांगून, कोणत्याही शेतकऱ्याची जमीन बळजबरीने घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या गावांमध्ये मोजणी झालेली नाही तेथील शेतकऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.