शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:58 IST

समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार गिरीश महाजन : महामार्ग होणारच

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार असून, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शेतकऱ्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील नागपूरपासून शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे होत समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास सुरुवात केली आहे. अन्य भागातूनही या महामार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या समृद्धी महामार्गाला असलेल्या विरोधाकडे महाजन यांचे लक्ष वेधले असता, नाशिक जिल्ह्णासाठी अलीकडेच जमिनींचे दर जाहीर करण्यात आले असून, त्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्यात आले आहेत. अन्य प्रकल्पांसाठी अगोदर सरकारकडून जमीन संपादित केली जात व नंतर शेतकऱ्यांना दहा, पंधरा वर्षांनंतर मोबदला मिळत होता परंतु या महामार्गासाठी थेट खरेदीने शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार आहे व त्याचा मोबदलाही तत्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे काही प्रश्न असतील तर सरकारकडे चर्चेसाठी यावे सरकार चर्चेला तयार आहे असे सांगून, कोणत्याही शेतकऱ्याची जमीन बळजबरीने घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या गावांमध्ये मोजणी झालेली नाही तेथील शेतकऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.