शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे आदेश : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ योजना सुख-दु:खात वृक्षांची रोपे होणार साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:10 IST

नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्टÑ अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला.

ठळक मुद्देवृक्षांची रोपे देऊन भावना व्यक्त करण्याचे आदेश ग्रामपंचायतीमध्ये योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्टÑ अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यामध्ये मानवाशी निगडीत आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात वृक्षांची रोपे देऊन भावना व्यक्त करण्याचे आदेश आता शासनानेच काढले आहेत. राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ ही योजना ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. याबाबत नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सर्व ग्रामपंचायतीमध्ये योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. जागतिक उष्ण तपमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल, पाण्याचे दुर्भिक्ष, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्षलागवडीचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेण्यात येणार आहे. यामध्ये शुभेच्छा वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंदवृक्ष, माहेरची झाडी, आणि स्मृती वृक्ष अशी संकल्पना आखण्यात आली आहे. शुभेच्छा वृक्ष म्हणजे गावात जन्माला येणाºया बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करावे, शुभमंगल वृक्ष म्हणजे, दरवर्षी गावातील ज्यांचे विवाह होतील त्यांना फळझाडांची रोपे देण्यात यावीत, आनंदवृृक्ष म्हणजे, दरवर्षी गावातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण होतील, नोकºया मिळतील, जे उमेदवार विविध निवडणुकांमध्ये विजयी होतील. अशा आनंदाच्या क्षणी त्यांना फळझाडाची रोपे देऊन शुभेच्छा द्याव्यात, माहेरची झाडी म्हणजेच गावातील विवाहित मुलींच्या माहेरच्या लोकांनी त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभाशीर्वाद द्यावेत आणि स्मृती वृक्ष म्हणजे, गावातील एखाद्या व्यक्तीचे वर्षभरात निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना फळझाडाची रोपे देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी. अशी संकल्पना शासनाने मांडली आहे. रोपांच्या संगोपनासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने अभिनव योजना राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायतीनी १ जुलै ते चालू वर्षाचे ३० जून हे वर्ष गृहीत धरून जन्म, विवाह, मृत्यू यानुसार अंदाजपत्रक तयार करून १ जुलै रोजी एकदाच रोपांचे वाटप करावयाचे आहे. याची नोंद ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करावयाची आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाºयांना दिले आहेत.