शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शासकीय कार्यालयांना स्वत:च्या जागेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:52 IST

इंदिरानगर : अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. सुमारे वीस वर्षांपासून परिसरातील ही कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्या अन्य विभागांच्या जागेत सुरू असून, त्यांच्याकडून भाडे आकारले जात आहे. लाखो रु पयांचा महसूल देऊन सुद्धा कर्मचारी व नागरिकांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची गैरसोय : लाखो रु पयांचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. सुमारे वीस वर्षांपासून परिसरातील ही कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्या अन्य विभागांच्या जागेत सुरू असून, त्यांच्याकडून भाडे आकारले जात आहे. लाखो रु पयांचा महसूल देऊन सुद्धा कर्मचारी व नागरिकांची गैरसोय होत आहे.वीस वर्षांपूर्वी महारुद्र कॉलनीतील बंगला भाडेतत्त्वावर घेण्यात येऊन तेथे दूरध्वनी व भ्रमणध्वनी केंद्र सुरू करण्यात आले. परिसरातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या हजारोच्या संख्येत आहे. या दूरध्वनी केंद्रातून नवीन जोडणी आणि तक्र ार निवारण करण्यात येते. अपुºया जागेमध्येच यंत्रसामग्री व कर्मचाऱ्यांची आसनव्यवस्था आहे. या यंत्र सामग्रीमुळे अधिकारी व कर्मचाºयांना बसणे सुद्धा मुश्किल झाले आहे. महापालिकेचे उपकार्यालय लोक सुविधा केंद्रात असल्याने कर्मचारी आणि नागरिक यांची गैरसोय होत आहे. कमोदनगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये मनपाची उपकार्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु येथे असणारे सुमारे १३ कर्मचाºयांना त्रास होत असल्याने अखेर येथील कार्यालय पंधरा वर्षांपूर्वी शंभर फुटी रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या लोकसुविधा केंद्रात सुरू करण्यात आले. हे केंद्र अपुºया जागेत आहे.असून, उपकार्यालात आठ ते दहा कर्मचारी असून, त्यांच्यासाठी अवघ्या सहा ते सात खुर्च्या आहेत.संगणक आणि भ्रमणध्वनीच्या जमान्यात आजही पोस्टाचे महत्त्व तितकेच आहे. कारण की पॅनकार्ड, वाहनपरवाना, आधार कार्ड, नोकरीचेपत्र, बहुतेक सरकारी कामे पोस्टाद्वारे होतात. जॉगिंग ट्रॅकलगत एका अपार्टमेंटमधील छोट्या सदनिकेमध्ये पोस्टाचे उपकार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे येणाºया नागरिकांना येथे उभे राहायची जागा नाही, त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.दूरध्वनी केंद्र, मनपाचे उपकार्यालय व पोस्टाचे उपकार्यालय केव्हा स्वमालकीच्या जागेत जाणार? असा प्रश्न आहे.दूरध्वनी केंद्र व पोस्टाचे उपकार्यालय यांचे भाडे स्वरूपात लाखो रु पये अद्यापर्यंत गेले असून, तेवढ्या रु पयात स्वमालकीची इमारत झाली असती. उपकार्यालयाच्या वतीने लाखो रु पयांचा महसूल गोळा करूनही अद्यापर्यंत स्व मालकीची इमारत का होत नाही, असा प्रश्न सर्वच नागरिकांना पडला आहे .वारंवार मागणी करूनही कर्मचारी आणि नागरिकांची गैरसोय काही थांबत नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार