शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाबाबत सरकार गंभीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी हिंसक झाले तर त्यास सरकारच जबाबदार, असे स्पष्ट मत ...

नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी हिंसक झाले तर त्यास सरकारच जबाबदार, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे आंदोलन हिंसक व्हावे, ही केंद्र शासनाची अपेक्षा आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी नाशिकरोड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही. केंद्रात बहुमत आहे, म्हणून अहंकार योग्य नाही, असा अहंकार जनतेपुढे चालत नाही असे सांगून राऊत म्हणाले, शेतकरी आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अराजकता माजू शकते आणि शेतकरी हिंसक झाल्यास सरकारच जबाबदार राहील, असे शरद पवार देखील म्हटले आहेत, त्याचे स्मरणही राऊत यांनी सांगितले. मुळात हे आंदोलन राजकीय पक्षांचे नसून किसान संघटनांचे आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही खासदार राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय वादाविषयी बोलताना राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असावे हे अगोदरच ठरले आहे, असेही सांगताना त्यांनी सत्ताबदलासाठी फासे टाकणाऱ्या विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. पाच वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले, त्यांनी आता पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही राऊत यांनी लावला. एल्गार परिषदेसंदर्भात बोलताना त्यांनी त्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामुळे राज्यात वातावरण खराब होत असेल तर यापुढे परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, असेही राऊत म्हणाले.

इन्फो...

राज्यपालांनी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत अद्याप निर्णय होत नाही. मुळात सरकारने केलेल्या शिफारसी राज्यपालांना स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे आमदार नियुक्तीसाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.