शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शेतकरी आंदोलनाबाबत सरकार गंभीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी हिंसक झाले तर त्यास सरकारच जबाबदार, असे स्पष्ट मत ...

नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी हिंसक झाले तर त्यास सरकारच जबाबदार, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे आंदोलन हिंसक व्हावे, ही केंद्र शासनाची अपेक्षा आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी नाशिकरोड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही. केंद्रात बहुमत आहे, म्हणून अहंकार योग्य नाही, असा अहंकार जनतेपुढे चालत नाही असे सांगून राऊत म्हणाले, शेतकरी आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अराजकता माजू शकते आणि शेतकरी हिंसक झाल्यास सरकारच जबाबदार राहील, असे शरद पवार देखील म्हटले आहेत, त्याचे स्मरणही राऊत यांनी सांगितले. मुळात हे आंदोलन राजकीय पक्षांचे नसून किसान संघटनांचे आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही खासदार राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय वादाविषयी बोलताना राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असावे हे अगोदरच ठरले आहे, असेही सांगताना त्यांनी सत्ताबदलासाठी फासे टाकणाऱ्या विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. पाच वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले, त्यांनी आता पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही राऊत यांनी लावला. एल्गार परिषदेसंदर्भात बोलताना त्यांनी त्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामुळे राज्यात वातावरण खराब होत असेल तर यापुढे परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, असेही राऊत म्हणाले.

इन्फो...

राज्यपालांनी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत अद्याप निर्णय होत नाही. मुळात सरकारने केलेल्या शिफारसी राज्यपालांना स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे आमदार नियुक्तीसाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.