शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

शेतकरी आंदोलनाबाबत सरकार गंभीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी हिंसक झाले तर त्यास सरकारच जबाबदार, असे स्पष्ट मत ...

नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी हिंसक झाले तर त्यास सरकारच जबाबदार, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे आंदोलन हिंसक व्हावे, ही केंद्र शासनाची अपेक्षा आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी नाशिकरोड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही. केंद्रात बहुमत आहे, म्हणून अहंकार योग्य नाही, असा अहंकार जनतेपुढे चालत नाही असे सांगून राऊत म्हणाले, शेतकरी आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अराजकता माजू शकते आणि शेतकरी हिंसक झाल्यास सरकारच जबाबदार राहील, असे शरद पवार देखील म्हटले आहेत, त्याचे स्मरणही राऊत यांनी सांगितले. मुळात हे आंदोलन राजकीय पक्षांचे नसून किसान संघटनांचे आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही खासदार राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय वादाविषयी बोलताना राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असावे हे अगोदरच ठरले आहे, असेही सांगताना त्यांनी सत्ताबदलासाठी फासे टाकणाऱ्या विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. पाच वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले, त्यांनी आता पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही राऊत यांनी लावला. एल्गार परिषदेसंदर्भात बोलताना त्यांनी त्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामुळे राज्यात वातावरण खराब होत असेल तर यापुढे परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, असेही राऊत म्हणाले.

इन्फो...

राज्यपालांनी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत अद्याप निर्णय होत नाही. मुळात सरकारने केलेल्या शिफारसी राज्यपालांना स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे आमदार नियुक्तीसाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.