शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाच महिन्यांपासून निराधार वृद्धांकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 23:01 IST

जुनी शेमळी : गेल्या चार ते पाच महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उसने पैसे घेऊन वेळ काढावी लागत आहे. बागलाण तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार अपंग ज्येष्ठ नागरिक यांचे मानधन गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक नागरिकांवर अक्षरश: उधारी घेण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देज्येष्ठांची दर महिन्याला बँकेत धावपळ, पगार मिळणार का अशी चौकशी

गणेश बागुलजुनी शेमळी : गेल्या चार ते पाच महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उसने पैसे घेऊन वेळ काढावी लागत आहे. बागलाण तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार अपंग ज्येष्ठ नागरिक यांचे मानधन गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक नागरिकांवर अक्षरश: उधारी घेण्याची वेळ आली आहे.मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने तरी आधार देण्याची गरज आहे. तळागाळातील नागरिकांचा विचार करून शासन योजना राबवित असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत.संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा अशा दारिद्र्यरेषेखालील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान गत चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. त्यामध्ये चार ते पाच महिन्यांपासून लाभार्थ्यांचे पैसे मिळाले नाहीत. सण, उत्सवाच्या काळात लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.काही लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या या मानधनावर अवलंबून असल्याने त्यांची दमछाक होत आहे. शासनाकडून आधीच तुटपुंजे अनुदान अन् तेही ४ ते ६ महिने मिळत नाही. त्यामुळे ह्या लाभार्थ्यांनी काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.हजार रुपयांच्या मानधनामध्ये घरातील किराणा खर्च पण भागत नसल्याने मानधन दोन हजार रुपये करावे अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. खरे लाभार्थी अनेक कागदपत्रांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे वंचित असतात. तरी शासनाने कागदपत्रांसाठी असलेल्या जाचक अटी कमी करून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावा ही वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिक व निराधारांनी अपेक्षा बोलून दाखवली.शासनाने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या योजनांचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्यांना अडचणी येत आहेत. दैनंदिन गरजा आणि मिळणारे मानधन यांचा ताळमेळ बसत नाही. तरी शासनाने मानधनात वाढ करून दर महिन्याला वेळेवर मानधन द्यावे.- अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी.

टॅग्स :Governmentसरकारbankबँक