शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

पाच महिन्यांपासून निराधार वृद्धांकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 23:01 IST

जुनी शेमळी : गेल्या चार ते पाच महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उसने पैसे घेऊन वेळ काढावी लागत आहे. बागलाण तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार अपंग ज्येष्ठ नागरिक यांचे मानधन गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक नागरिकांवर अक्षरश: उधारी घेण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देज्येष्ठांची दर महिन्याला बँकेत धावपळ, पगार मिळणार का अशी चौकशी

गणेश बागुलजुनी शेमळी : गेल्या चार ते पाच महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उसने पैसे घेऊन वेळ काढावी लागत आहे. बागलाण तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार अपंग ज्येष्ठ नागरिक यांचे मानधन गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक नागरिकांवर अक्षरश: उधारी घेण्याची वेळ आली आहे.मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने तरी आधार देण्याची गरज आहे. तळागाळातील नागरिकांचा विचार करून शासन योजना राबवित असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत.संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा अशा दारिद्र्यरेषेखालील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान गत चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. त्यामध्ये चार ते पाच महिन्यांपासून लाभार्थ्यांचे पैसे मिळाले नाहीत. सण, उत्सवाच्या काळात लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.काही लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या या मानधनावर अवलंबून असल्याने त्यांची दमछाक होत आहे. शासनाकडून आधीच तुटपुंजे अनुदान अन् तेही ४ ते ६ महिने मिळत नाही. त्यामुळे ह्या लाभार्थ्यांनी काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.हजार रुपयांच्या मानधनामध्ये घरातील किराणा खर्च पण भागत नसल्याने मानधन दोन हजार रुपये करावे अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. खरे लाभार्थी अनेक कागदपत्रांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे वंचित असतात. तरी शासनाने कागदपत्रांसाठी असलेल्या जाचक अटी कमी करून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावा ही वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिक व निराधारांनी अपेक्षा बोलून दाखवली.शासनाने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या योजनांचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्यांना अडचणी येत आहेत. दैनंदिन गरजा आणि मिळणारे मानधन यांचा ताळमेळ बसत नाही. तरी शासनाने मानधनात वाढ करून दर महिन्याला वेळेवर मानधन द्यावे.- अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी.

टॅग्स :Governmentसरकारbankबँक