शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीस शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:10 IST

राज्यात ७४ वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास शासनाची उदासीन भूमिका आहे. घटना दुरुस्ती व नगरराज बिल अधिकारांचे विकेंद्रीकरण व निर्णय प्रक्रियेत शासनासह लोकसहभागाची सध्या गरज असल्याचे नगरराज बिल समर्थन मंचच्या सहसंयोजिका वर्षा विद्या विलास यांनी मंचतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

मालेगाव कॅम्प : राज्यात ७४ वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास शासनाची उदासीन भूमिका आहे. घटना दुरुस्ती व नगरराज बिल अधिकारांचे विकेंद्रीकरण व निर्णय प्रक्रियेत शासनासह लोकसहभागाची सध्या गरज असल्याचे नगरराज बिल समर्थन मंचच्या सहसंयोजिका वर्षा विद्या विलास यांनी मंचतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.  एरिया सभा (नगरराज बिल) समर्थन मंचद्वारा हॉटेल मराठा दरबार येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वर्षा विलास यांनी सांगितले की, भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. १९५० ला राज्य घटना आली. ७४ व्या घटना दुरुस्तीचा अभ्यास करताना राजकीय, आर्थिक, सामाजिक इतर पार्श्वभूमीचा आढावा घेणे महत्वाचे आहे. ७४ वी घटना दुरुस्ती झाली. यामुळे लोकशाहीचा तिसरा स्तर निर्माण केला; परंतु यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यभारात प्रक्रियतेत ह्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे मंचातर्फे शासनाला न्यायालयात जाब विचारला आहे. या घटना दुरुस्तीमध्ये नगरराज बिल कायद्याची माहिती दिली गेली आहे. नगरपालिका, महापालिकेतील नगरसेवक वॉर्ड मध्ये मतदान बुथप्रमाणे मतदारांच्या तयार होणाऱ्या प्रभाग सभांच्या माध्यमातून कशा पद्धतीने कामे करता येईल. त्याचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, उपाययोजनेची माहिती दिली आहे. त्यामुळे नगरसेवकसह लोकसहभाग तेवढाच महत्वाचा असल्याचे वर्षा विलास यांनी सांगितले. समर्थन मंचचे सीताराम शेलार सदर कायद्याच्या बाबीवर शहर, जिल्ह्यात महापालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, नगरसेवकांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषद सद्भावना संघ, दारिपा सभा समर्थन मंच, लोक समिती, राष्टÑसेवा दल, साने गुरूजी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत वर्षा विद्या विलास, सीताराम शेलार, साने गुरूजी परिवाराचे संजय जोशी, राजेंद्र भोसले, धुळे मंचाचे नवल ठाकरे यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :GovernmentसरकारMalegaonमालेगांव