शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जुंपले कामाला; केलेल्या कामांचीच हवी आहे माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:49 IST

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच्या आघाडी सरकारच्या कामगिरीच्या तुलनेत युती सरकारची ठळक कामगिरी जनतेसमोर मांडता यावी यासाठी राज्य सरकारने अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातून शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा अहवाल मागवत आघाडी सरकारच्या काळातील कामगिरी व गेल्या चार वर्षांतील कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी ८० प्रश्नसंचामध्ये भरून देण्याच्या सूचना असून, त्या आधारे सरकार आपली प्रतिमा उजळ करणार आहे.

ठळक मुद्देप्रतिमा उजळण्याचा प्रयत्न : आघाडी व युतीच्या कामगिरीतील फरक घेणार जाणून

श्याम बागुल ।नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच्या आघाडी सरकारच्या कामगिरीच्या तुलनेत युती सरकारची ठळक कामगिरी जनतेसमोर मांडता यावी यासाठी राज्य सरकारने अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातून शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा अहवाल मागवत आघाडी सरकारच्या काळातील कामगिरी व गेल्या चार वर्षांतील कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी ८० प्रश्नसंचामध्ये भरून देण्याच्या सूचना असून, त्या आधारे सरकार आपली प्रतिमा उजळ करणार आहे.साडेचार वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारने काहीच कामगिरी केली नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असल्यामुळे त्याला मुंहतोड उत्तर देण्यासाठी युती सरकारने आपल्या सरकारच्या काळात आघाडी सरकारपेक्षाही अधिक उजळ कामगिरी केल्याचे दाखविण्यासाठी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या प्रश्नसंचामध्ये सन २००९ ते २०१४ या काळात व २०१४ ते २०१८ या काळात झालेल्या कामांची फक्त आकडेवारी नमूद प्रश्नासमोर भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने कृषी विषयक योजनांची प्रगती, जलयुक्त शिवार योजनांची कामे, आवास योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजनेची कामे, बचत गटांची संख्येचा समावेश आहे. (पान ३ वर)पाणीपुरवठा योजनांना मंजुरी, ग्रामीण भागातील रस्ते, पानंद रस्त्यांची संख्या, राष्टÑीव व राज्यमार्गाची उभारणी, नवीन शाळांची बांधणी, डिजिटल शाळांची संख्या, वसतिगृहे, शिष्यवृत्तीचे वाटप, मुख्यमंत्री आरोग्य शिबिरातील लाभार्थींची संख्या, आयुष्यमान योजनेचे लाभार्थी, पर्यटन वृद्धी, वीज पुरवठा, वृक्षारोपण, जिल्ह्णातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, शौचालय उभारणी, नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती, मुद्रा योजनेचे लाभार्थी, एलपीजी कनेक्शन यांसह केंद्रातील संपुआ सरकारने २००८ मध्ये शेतकºयांना दिलेल्या सरसकट कर्जमाफीची तुलना करून राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत शेतकºयांना मिळालेल्या कर्जमाफीची संख्या विचारण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत शेतकºयांना कर्जमाफीसोबतच पीकविमा, नैसर्गिक आपत्ती, बोंडअळी, गारपीट, दुष्काळी आदी सर्व प्रकारच्या मदतीची एकूण रकमेचा समावेश त्यात करण्याच्या सूचना आहेत, त्याचबरोबर आवास योजनेत प्रधानमंत्री, शबरी, रमाई अशा सर्व प्रकारच्या घरकुलांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हाधिकाºयांना ‘एक्सेल शीट’ पाठविलेगेल्या आठवड्यात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाºयांना याबाबतचे ‘एक्सेल शीट’ पाठविण्यात आले आहे. या सर्व माहितीचा आधार घेत सरकार निवडणूक प्रचारात आपली प्रतिमा ‘उजळ’ करून घेणार आहे.