शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
3
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
4
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
5
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
6
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
7
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
8
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
9
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
10
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
11
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
12
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
13
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
14
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
15
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
16
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
17
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
18
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
19
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
20
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रतन इंडिया वीज प्रकल्प सुरू करण्यास शासन अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:53 IST

सिन्नर: येथील रतन इंडियाच्या औष्णिक वीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज २ रुपये ८८ पैसे युनिट दराने घेण्यास राज्य शासनाने ...

ठळक मुद्देबैठक: उपमुख्यमंत्र्यांकडून महाजनको, वीज वितरणला सूचना

सिन्नर: येथील रतन इंडियाच्या औष्णिक वीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज २ रुपये ८८ पैसे युनिट दराने घेण्यास राज्य शासनाने तयारी दर्शवत हा प्रकल्प सुरू करण्याबाबत महाजनको आणि वीज वितरण बरोबर चर्चा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.येथील रतन इंडियाच्या औष्णिक वीज प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंगळवारी (दि.२२) उर्जा मंत्री, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव, अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार माणिकराव कोकाटे, अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, पीएफसी चेअरमन डिलॉन, महासंचालक, महाऊर्जा, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, नाशिक (व्ही.सी. द्वारे), अन्य कार्यकारी संचालक यांच्यासह रतन इंडिया कंपनीचे चेअरमन राजीव रतन, संजय मलहोत्रा, ऊर्जा प्रकल्प व संबंधित अधिकारी उपस्थित होते.एकलहरा प्रकल्प सुरू करण्यासाठी महाजनकोला ३५०० कोटी खर्च करणे परवडणारे नाही. रतन इंडियाचा प्रकल्प बंद पडला तर भविष्यात राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास शासनाचे नुकसान होईल, राज्य शासनाने प्रकल्प सुरू करण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी विनंती राजीव रतन यांनी केली. रतन इंडिया कंपनीच्या प्रस्तावानुसार महागड्या दराने वीज खरेदी करणे शासनाला शक्य होणार नसल्याचे पवार यांनी सांगत २ रुपये ८८ पैसे युनिट दराने वीज खरेदीबाबत महाजनको आणि वीज वितरण यांनी चर्चा करून प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश दिला.भविष्यात लागणार विजेची गरजरतन इंडिया कंपनीने ९४०० कोटी रुपये खर्च करून १३५० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेलाइनचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, २० टक्के काम बाकी आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच दिल्ली मुंबई कॅरिडोअर सिन्नर मध्ये ५००० एकरमध्ये एमआयडीसीने आरक्षण टाकले आहे. भविष्यात दिल्ली-मुंबई कॅरिडोअरसाठी विजेची गरज लागणार असून, कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प सुरू व्हावा, अशी आग्रही मागणी कोकाटे यांनी केली. 

टॅग्स :Governmentसरकारelectricityवीज