शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

शासनाच्या कर्जमाफीचा काकडगावला निषेध

By admin | Updated: June 29, 2017 00:57 IST

नामपूर : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकऱ्यांनी सोसायटीच्या कार्यालयात एकत्र येत सरसकट कर्जमाफी योजना फसवी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करून या कर्जमाफीचा निषेध केला आहे

  लोकमत न्यूज नेटवर्क

नामपूर : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकऱ्यांनी सोसायटीच्या कार्यालयात एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी योजना फसवी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करून या कर्जमाफीचा निषेध केला आहे. ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. प्रत्यक्षात डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा हा प्रकार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कर्जमाफीत जाचक अटी व नियम लावलेले आहेत. या योजनेत प्रत्येक गावात बोटावर मोजण्याइतकेसुद्धा शेतकरी बसलेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांचे २०१२ पूर्वी कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही. यामुळे सन २००८ च्या कॉँग्रेस सरकारच्या काळात जे शेतकरी वंचित राहिले आहेत ते पुन्हा आजच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. वास्तविक हेच शेतकरी खऱ्या अर्थाने गरीब व गरजू आहेत. अशा शेतकऱ्यांचा आकडा खूप मोठा आहे. तसेच पोल्ट्री, विहीर, मोटार, गृहकर्ज आदींना या योजनेतून बाद केले आहे. याव्यतिरिक्त २०१६ हे वर्ष अंतिम थकबाकीचे वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ २५ हजार रुपये सूट देण्यात येणार आहे. मात्र यासाठी ३० जूनअखेर सर्व कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज रक्कम असेल तर वरची रक्कम रोख भरावी लागणार आहे. या कर्जमाफीतून शासकीय कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आले आहे. अशा कर्जदारांची संख्या मुळात कमी आहे. सरसकट कर्जमाफीचा शब्द वापरून त्यात एवढे निकष लावल्यामुळे ही कर्जमाफी नेमकी कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. आगामी काळात सरकारने कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्यास संपूर्ण गावकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयातच आमरण उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सोसायटी अध्यक्ष रामू अहिरे, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजाराम पाटील, प्रगत शेतकरी पंडित पाटील, सरपंच निंबा सोनवणे, संचालक अजित अहिरे, शिवाजी अहिरे, सुरेश अहिरे, नंदलाल अहिरे, विनोद पाटील, विलास अहिरे, देवराव अहिरे, प्रशांत पवार, दादाजी सोनवणे, अभिमन पवार, बाजीराव अहिरे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. चौकट . सरसकट कर्जमाफीसाठी दिलेल्या अटी व नियम जाचक आहेत. अजून शासनाचे परिपत्रक प्राप्त न झाल्यामुळे नेमका लाभ कोणाला मिळेल, हे सांगणे आज तरी कठीण आहे. हेमंत भामरे, निरीक्षक, जिल्हा बॅँक, नामपूर फोटो ओळी . संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण शेतकरी आज शासनाच्या भूलथापांना बळी पडत असून, प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून दिशाभूल करीत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. फसव्या सरसकट कर्जमाफीचा निषेध करण्यात आला. येत्या आठ दिवसात सरकारने वंचित शेतकऱ्यांचा विचार केला नाही तर यापुढे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही राजकीय नेत्याला काकडगावात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.