शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शासनाची कर्जमाफी फसवी

By admin | Updated: June 18, 2017 00:44 IST

देवीदास पवार : सरकार चले जावची भूमिका घेऊन पुन्हा उतरणार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : भाजपा सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी केलेली असताना तत्त्वत:, सरसकट आणि निकषांच्या आधीन असलेली सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी आहे. त्यामुळे सातबारा कोरा करा या मागणीसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी सरकार ‘चले जाव’ची भूमिका घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी दिला. तातडीने द्यावयाच्या दहा हजार रुपये पीककर्जाचे आदेश त्यातील निकषही शेतकऱ्यांचा अंत पाहणारे आहेत, त्यामुळे ही कर्जमाफीही फसवी असून, सातबारा कोरा होणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. याच मागणीकरिता आता सरकारच्या विरोधात उभे रहावे यावर शेतकरी संघटनेकडून विचारमंथन सुरू झाले असल्याचे पवार यांनी सांगितले.पवार पुढे म्हणाले की, आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत म्हणून थांबला आहे, तर सरकारने तातडीने दहा हजारांचे पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले असले तरी सरकारी इतर बँकांना अद्यापही तसे निर्देश नाहीत. ही योजना राबवायला सरकारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही, आदेश मात्र निघत आहेत. त्याची अंमलबजावणी कोणी करायची? त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वत: आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व करायला पुढे आले पाहिजे. सातबारा कोरा व्हावा या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा ही घोषणा केलेली मागणी सरकारने पुर्ण करावी अन्यथा सरकार चले जावची भूमिका घेऊन संघटनेला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.शेतकऱ्यांमध्ये चिंतादेवळा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला होता. परंतु कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता ठेवलेले निकष पाहता बहुतांश थकबाकीदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या कर्जमाफीसाठी आपण पात्र ठरतो की नाही याबाबत शेतकरी जाणकार व्यक्तींकडून माहिती घेताना दिसत आहेत. थकबाकीदार असलेल्या सभासदांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.