शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

शासनाची कर्जमाफी फसवी

By admin | Updated: June 18, 2017 00:44 IST

देवीदास पवार : सरकार चले जावची भूमिका घेऊन पुन्हा उतरणार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : भाजपा सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी केलेली असताना तत्त्वत:, सरसकट आणि निकषांच्या आधीन असलेली सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी आहे. त्यामुळे सातबारा कोरा करा या मागणीसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी सरकार ‘चले जाव’ची भूमिका घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी दिला. तातडीने द्यावयाच्या दहा हजार रुपये पीककर्जाचे आदेश त्यातील निकषही शेतकऱ्यांचा अंत पाहणारे आहेत, त्यामुळे ही कर्जमाफीही फसवी असून, सातबारा कोरा होणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. याच मागणीकरिता आता सरकारच्या विरोधात उभे रहावे यावर शेतकरी संघटनेकडून विचारमंथन सुरू झाले असल्याचे पवार यांनी सांगितले.पवार पुढे म्हणाले की, आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत म्हणून थांबला आहे, तर सरकारने तातडीने दहा हजारांचे पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले असले तरी सरकारी इतर बँकांना अद्यापही तसे निर्देश नाहीत. ही योजना राबवायला सरकारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही, आदेश मात्र निघत आहेत. त्याची अंमलबजावणी कोणी करायची? त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वत: आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व करायला पुढे आले पाहिजे. सातबारा कोरा व्हावा या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा ही घोषणा केलेली मागणी सरकारने पुर्ण करावी अन्यथा सरकार चले जावची भूमिका घेऊन संघटनेला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.शेतकऱ्यांमध्ये चिंतादेवळा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला होता. परंतु कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता ठेवलेले निकष पाहता बहुतांश थकबाकीदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या कर्जमाफीसाठी आपण पात्र ठरतो की नाही याबाबत शेतकरी जाणकार व्यक्तींकडून माहिती घेताना दिसत आहेत. थकबाकीदार असलेल्या सभासदांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.