शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

दरवाढीमागे सरकार नव्हे बिल्डरच

By admin | Updated: January 25, 2015 00:15 IST

दरवाढीमागे सरकार नव्हे बिल्डरच

नाशिक - शहरात रेडीरेकनरचे दर वाढल्याची हाकाटी बांधकाम व्यावसायिक पिटत असले तरी हे दर मुळातच कसे वाढले, त्यामागे केवळ सरकारच आहे की बिल्डर व्यावसायिकांचा काळाबाजार याचा विचार केला तर जमिनीचे दर वाढण्यामागे सरकारपेक्षा विकासकच अधिक जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. सोयी-सोयीने रेडीरेकनर आणि बाजारभावाचा व्यवहार करणाऱ्या विकासकांचीच दरवाढीच्या विरोधात ओरड होत आहे, हे विशेष होय.नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांत जमिनींचे प्रचंड भाव वाढले आहेत. टु रूम किचन सदनिका घेण्यासाठी लागणारे पाच ते सहा लाख रुपयांमध्ये आता वन रूम किचनही मिळत नाही. चांगल्या वस्तीत सदनिका खरेदी करायची असेल तर हेच दर कमीत कमी ३५ लाख रुपयांच्या पुढे आहेत. अनेक भागांत तर सदनिकांचे दर ६५ लाख रुपयांपासून दोन कोटी रुपयांचे आहेत. ज्यांना परवडेल अशाच व्यक्ती हे खरेदी करीत नसले तरी कल्पनेत नसलेले हे दर कसे वाढले, याचा शोध घेण्याची गरज आहे. रेडीरेकनरचे दर ठरविताना नगररचना विभागाच्या वतीने शहराचे २२ भाग करण्यात आले असून, तेथील सर्वाधिक दराचा झालेला आणि जो मुद्रांक शुल्काच्या दस्त नोंदणीत आहे, अशा व्यवहाराचा आधार घेतला जातो असे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे. विकासकांनादेखील ते मान्य आहे, परंतु एकाच सर्व्हेमध्ये सर्व व्यवहार त्या दराने होत नाही असा त्यांचा दावा आहे. दोन्ही दावे खरे मानले तरी मुळातच सरकारने जो दर ठरविला त्याच्या आसपास त्या विभागात व्यवहार झाला असेल तर तो मान्यच करावा लागेल. मग सरकारचे दरच जेथे कमी होते त्यापेक्षा अधिक दराने व्यवहार कसा झाला, असा प्रश्न निर्माण होतो.याचाच अर्थ बाजारभावापेक्षा अधिक दराने व्यवहार होतच असतात. हा व्यवहाराचाच भाग आहे. मग बाजारात विकासक जे दर ठरवितात त्याच्या कुठे तरी जवळपास सरकारी दर येत असेल तर चूक सरकारची की विकासकांची? जमिनीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, ही गुंतवणूक सर्वसामान्य नागरिकांकडून कमी होत, बांधकामातदेखील अतिरिक्तसदनिका घेणे त्यांनाच परवडते ज्यांच्याकडे दोन पैसे जास्त आहेत आणि त्यांना गुंतवणूक करून नंतर लाभ मिळवायचा आहे. त्यातही अधिकारी-राजकारणी, पेशेवर अशा घटकांकडून काळा पैसा गुंतवण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र रिअल इस्टेट हेच ठरले आहे. साहजिकच काळा पैसा पांढरा करण्यासाठी ज्या भागात ३५ हजार रुपये दर आहे, त्या भागात अशाप्रकारे काळ्या पैशांची गुंतवणूक करणारे चाळीस ते पंचेचाळीस हजार भावाने गुंतवणूक केल्याचे दाखवतात आणि प्रत्यक्षात दर कमी असतात. असाच व्यवहार नोंदविला गेला की साहजिकच सरकार तेच जमिनीचे दर आहे, असे मान्य करते आणि त्यानुसार पुढील वर्षीचे दर त्यावरच आधारित ठरतात. त्यामुळे पुढील वर्षी त्या नोंदविल्या गेलेल्या दस्तापेक्षा अधिक दर सरकार जाहीर करते. मग यात चूक कोणाची? सरकारची की जमीन किंवा सदनिकेत काळा पैसा गुंतवण्याच्या नादात जास्त दराने खरेदी दाखविणाऱ्या विकासकांची, याचा विचार केला तर अर्थातच विकासकच आहेत, हे स्पष्ट होते. रेडीरेकरनरचे दर वाढविल्याने त्याचा फटका शेवटी घर खरेदी करणाऱ्यांना बसणार हे खरेच आहे, परंतु दरवाढ करण्यामागे केवळ सरकारच जबाबदार आहे, असा जो कांगावा केला जातो तो पूर्णत: चुकीचा आहे. (प्रतिनिधी)