शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

रोजंदारी भरतीला शासनाचा अडसर

By admin | Updated: November 21, 2015 23:37 IST

रोजंदारी भरतीला शासनाचा अडसर

नाशिक : महापालिका महासभेत महापौरांनी शहर स्वच्छतेच्या खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळून लावत रोजंदारीवर कर्मचारी भरतीचा निर्णय जाहीर केला असला तरी, या भरतीप्रक्रियेला शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे. सद्यस्थितीत शासनाचे कर्मचारी भरतीबाबतचे धोरण पाहता आणि नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च ३८ टक्क्यांहून अधिक असल्याने भरतीला मान्यता मिळणे अवघड मानले जात आहे. दरम्यान, रोजंदारीवरील भरतीच्या निर्णयानंतर बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच नगरसेवकांमध्येही आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील साफसफाई व स्वच्छतेसाठी सुमारे ७०० कर्मचारी खासगी मक्तेदारामार्फत भरती करण्याचा १२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेत ठेवला होता. परंतु, महासभेत त्यावर चर्चा होण्यापूर्वीच महापौरांनी सदरचा प्रस्ताव फेटाळून लावत रोजंदारीवर कर्मचारी भरतीला मान्यता दिली. महापालिकेत १२६० रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरती झालेली नाही. त्यामुळे महासभेच्या निर्णयाने बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या असून आपल्याही कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेतील भरतीची चर्चा सुरू झालेली असतानाच या भरतीला मात्र शासनाची मान्यता लागणार आहे. रोजंदारीवर भरती केलेल्या कर्मचाऱ्याला कामगार कायद्यानुसार किमान वेतन देणे बंधनकारक आहे. सध्या महापालिकेचा आस्थापना खर्च ३८ टक्क्याहून अधिक असल्याने शासनाकडून भरती प्रक्रियेला मान्यता मिळणे अवघड मानले जात आहे. मनपाने सुरत पॅटर्ननुसार ८५ दिवसांच्या कालावधीसाठी भरती करण्याचा प्रस्ताव स्वीकारला तरीही महापालिकेला कोट्यवधीची आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. गुजरात येथे किमान वेतन २८२ रुपये असून महाराष्ट्रात किमान वेतनाचा दर ४२२ रुपये असल्याचे सांगण्यात येते. महापौरांनी रोजंदारीवरील कर्मचारी भरतीला मान्यता दिली असली तरी त्याच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे असल्याचे सांगितले जात आहे.

१२६० कर्मचारी भरतीची पुनरावृत्ती?

महापालिकेत यापूर्वी रोजंदारीवर कर्मचारी भरतीप्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. परंतु नंतर हीच भरती महापालिकेला महागात पडली. नऊ-दहा वर्षांपूर्वी १२६० कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता पुन्हा रोजंदारीवर कर्मचारी भरतीचा प्रस्ताव चर्चेत आला असल्याने भविष्यात १२६० कर्मचारी भरतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १२६० कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेमुळे महापालिकेला मनुष्यबळ लाभले; परंतु कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता भासली. त्यामुळेच सद्यस्थितीत महापालिकेत चतुर्थश्रेणीतील कर्मचारी तृतीय श्रेणीचे काम करताना दिसून येत आहे.