शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतनाला शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:56 IST

खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या राज्य पदाधिकाºयांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे अशी माहीती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नामदेव पावसे, उपाध्यक्ष अर्चना जाधव, सचिव कृष्णा बावणे यांनी दिली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पण प्रश्नचिन्ह कायम

खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या राज्य पदाधिकाºयांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे अशी माहीती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नामदेव पावसे, उपाध्यक्ष अर्चना जाधव, सचिव कृष्णा बावणे यांनी दिली.राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांना किमान वेतनामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ ने मागणी केल्यामुळे राज्य शासनाने वाढ केली आहे. यापुर्वीच्या निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाºयांना पाच ते सात हजार दरम्यान किमान वेतन दिले जात होते. किमान वेतनात वाढ करावी यासाठी अनेक वर्षापासुन आग्रह धरला होता. नवीन शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन ११६२५ते १४१२५ दरम्यान ़निश्चित करण्यात आलेले आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे सहसचिव साठे यांनी सोमवारी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांमध्ये कुशल अर्धकुशल व अकुशल यानुसार वेगवेगळे किमान वेतन दर जाहीर केले आहे.ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्येचा विचार करता परिमंडल एक ते तीन असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दहा हजारापेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीचा समावेश परिमंडल १ तर पाच ते दहा हजार लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतींचा समावेश परिमंळ २ तसेच पाच हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतचा समावेश परिमंडळ ३ मध्ये करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या किमान वेतन संदर्भात परिमंडल एक मधील कुशल कामगारांचे वेतन १४०३५ अर्धकुशल कामगारांचे किमान वेतन १३४२० कुशल कामगारांचे वेतन १३०८५ ठरविण्यात आले आहे.शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी कर्मचाºयांना हा निर्णय कधीपासुन लागु होणार आहे याबाबतचा प्रश्न पडलेला आहे. कारण एप्रिल २०१८ पासुन कर्मचाºयांना आॅनलाईन प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यात येत आहे. परंतु त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने कर्मचाºयांना वेतन हे सहा-सहा मिहने मिळत नाही. तसेच त्यांचा कपात केलेल्या फंडाची रक्कम तर अद्यापपावेतो जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता घेतलेला निर्णयाप्रमाणे सुधारीत किमान वेतन हे तरी नियमित मिळेल की नाही असा प्रश्न कर्मचाºयांना पडलेला आहे.

टॅग्स :Governmentसरकारpanchayat samitiपंचायत समिती