शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध दानवे : मालेगावी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:24 IST

मालेगाव : शेतकºयांच्या हितासाठी तिजोरी रिकामी झाली तरी चालेल मात्र शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील. शेतकºयांना रस्ते, वीज, कर्जमाफी, व्याजमाफी, पीकविमा, खतांची कृत्रिम टंचाई दूर करण्यास भाजपा शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.

ठळक मुद्देकेंद्रात चार व राज्यात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे

मालेगाव : शेतकºयांच्या हितासाठी तिजोरी रिकामी झाली तरी चालेल मात्र शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील. शेतकºयांना रस्ते, वीज, कर्जमाफी, व्याजमाफी, पीकविमा, खतांची कृत्रिम टंचाई दूर करण्यास भाजपा शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. येथील सटाणा नाका भागात मालेगाव महानगर व तालुका भाजपाने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी खासदार दानवे बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, आमदार सीमा हिरे, महानगरप्रमुख सुनील गायकवाड, जिल्हा बॅँकेचे चेअरमन केदा आहेर, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाप्रमुख दीपक पवार, संदीप पाटील, नगरसेवक मदन गायकवाड, जि.प. सदस्य समाधान हिरे, मनीषा हिरे, सुरेश निकम आदींसह भाजपा नगरसेवक उपस्थित होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे पुढे म्हणाले की, भाजपाच्या सरकारला केंद्रात चार व राज्यात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. शासनाने काय केले याचा अभ्यास कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. विरोधी पक्षाचे नेते एकेकाळी भाजपाची टिंगलटवाळी करायचे; मात्र कार्यकर्त्यांच्या कष्टाला यश आले आहे. सत्ता आल्यानंतर भाजपाने सर्वसामान्य नागरिकांच्या व शेतकरी हिताचे निर्णय घेतले. पीक आणेवारी काढण्याची ब्रिटिशकालीन पद्धत बंद केली. शेतकºयांना पीक विमा मिळवून दिला जात आहे. शेतकºयांसाठी वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने उपलब्ध करुन दिली जात आहेत. त्यामुळे शेतकºयांचा माल बाजारपेठेत वेळेवर पोहचतो. शेतकºयांना रांगेत उभे राहून युरीया घ्यावा लागायचा. कृत्रीम टंचाई करुन शेतकºयांना लुटले जायचे आता शासनाने शेतकºयांना मुबलक युरीया उपलब्ध करुन पाच वर्ष स्थिर भाव ठेवला आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. ३४ हजार २३४ कोटींची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. कर्जावरील व्याजही शासन भरणार आहे. विजेचा तुटवडा दूर करण्यात आला आहे. नवीन उपकेंद्रे उभे करुन सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे.विधान परिषदेसाठी युतीधर्म पाळावाराज्यात विधान परिषदेच्या सहा जागा आहेत. तीन भाजपा व तीन सेना असा फार्म्यूला ठरलेला आहे. शिवसेनेने आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्ही शिवसेनेला देऊ, पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने युतीधर्म पाळला पाहिजे, असे मत दानवे यांनी मेळावा संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनावर बोलताना दानवे म्हणाले की, भुजबळांना केवळ जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप मिटले नाहीत. नाशिक विधान परिषद निवडणुकीत पक्षाचा उमेदवाराच निवडून आणला जाईल. छुपा पाठिंबा दिला जाणार नाही. माजी मंत्री प्रशांत हिरे, अद्वय हिरे, आमदार अपूर्व हिरे राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत, असे विचारले असता भारतीय जनता पक्ष त्यांच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.