शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

उद्योगपतींचे नव्हे गोेरगरिबांचे सरकार हवे : राहुल गांधी

By admin | Updated: October 10, 2014 22:39 IST

उद्योगपतींचे नव्हे गोेरगरिबांचे सरकार हवे : राहुल गांधी

 नाशिक : नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार हे गोरगरीब जनतेसाठी नव्हे, तर केवळ श्रीमंत आणि उद्योगपतींसाठी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील या गरीब आणि दुबळ्या जनतेने मतपेटीतून आपली ताकद भाजपा सरकारला दाखवा आणि महाराष्ट्रात पुन्हा गरिबांचेच सरकार आणा, असे आवाहन कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले. कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची वणी (तालुका दिंडोरी) येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. जनतेला स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांचे सरकार गोरगरिबांसाठी नव्हे, तर उद्योगपतींसाठी आहे. कॉँग्रेसच्या काळात आधार योजनेद्वारे सरकारचा पैसा मनरेगा आणि अन्य योजनांतून अनुदानाच्या स्वरूपात थेट नागरिकांच्या खात्यात वर्ग केला जात होता. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात जनतेचा पैसा थेट उद्योगपतींच्या खात्यात जमा होत आहे. महाराष्ट्राची आणि फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची जी विचारधारा होती तीच कॉँग्रेसची आहे. गोरगरीब जनतेला सुरक्षा आणि विकासात पुढे नेण्याचेच धोरण कॉँग्रेस सरकारच्या काळात राबविले गेले. दुष्काळात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. आता कांदा उत्पादकांना निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कॉँग्रेस सरकारने ६ लाख लोकांना मोफत औषधे व आरोग्य सुविधा पुरविल्या. मोदी सरकारच्या काळात कर्करोग आणि मधुमेहाची हजाराच्या घरातील औषधे लाखात गेली आहेत. चीनच्या राष्ट्रपतींसोबत हिंदुस्थानात लडाखमध्ये चिनी सैन्यही घुसले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरूच आहे. आधी अच्छे दिन आयेंगे म्हणणारेच आता ‘जल्दी सब ठीक हो जाएगा’ म्हणत आहेत. जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्यांना त्यांची जागा दाखवा आणि भाजपाला गोरगरीब व सर्वसामान्यांची ताकद दाखवून द्या, महाराष्ट्रात गरिबांचेच सरकार हवे, असे प्रतिपादन त्यांनी उपस्थिताना केले. यावेळी राहुल गांधी यांनी जिल्'ातील कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे वाचत त्यांना व्यासपीठावर बोलवित उपस्थित जनतेला त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.(प्रतिनिधी) इन्फो.. मोदी को आपको ही हटाना हंै उपस्थितांपैकी कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाव, मोदी हटाव’चा नारा दिल्यावर राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे पाहून ‘अब आपको ही मोदी को हटाना हंै’ असे सांगताच हशा पिकला.