शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

उद्योगपतींचे नव्हे गोेरगरिबांचे सरकार हवे : राहुल गांधी

By admin | Updated: October 10, 2014 22:39 IST

उद्योगपतींचे नव्हे गोेरगरिबांचे सरकार हवे : राहुल गांधी

 नाशिक : नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार हे गोरगरीब जनतेसाठी नव्हे, तर केवळ श्रीमंत आणि उद्योगपतींसाठी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील या गरीब आणि दुबळ्या जनतेने मतपेटीतून आपली ताकद भाजपा सरकारला दाखवा आणि महाराष्ट्रात पुन्हा गरिबांचेच सरकार आणा, असे आवाहन कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले. कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची वणी (तालुका दिंडोरी) येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. जनतेला स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांचे सरकार गोरगरिबांसाठी नव्हे, तर उद्योगपतींसाठी आहे. कॉँग्रेसच्या काळात आधार योजनेद्वारे सरकारचा पैसा मनरेगा आणि अन्य योजनांतून अनुदानाच्या स्वरूपात थेट नागरिकांच्या खात्यात वर्ग केला जात होता. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात जनतेचा पैसा थेट उद्योगपतींच्या खात्यात जमा होत आहे. महाराष्ट्राची आणि फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची जी विचारधारा होती तीच कॉँग्रेसची आहे. गोरगरीब जनतेला सुरक्षा आणि विकासात पुढे नेण्याचेच धोरण कॉँग्रेस सरकारच्या काळात राबविले गेले. दुष्काळात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. आता कांदा उत्पादकांना निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कॉँग्रेस सरकारने ६ लाख लोकांना मोफत औषधे व आरोग्य सुविधा पुरविल्या. मोदी सरकारच्या काळात कर्करोग आणि मधुमेहाची हजाराच्या घरातील औषधे लाखात गेली आहेत. चीनच्या राष्ट्रपतींसोबत हिंदुस्थानात लडाखमध्ये चिनी सैन्यही घुसले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरूच आहे. आधी अच्छे दिन आयेंगे म्हणणारेच आता ‘जल्दी सब ठीक हो जाएगा’ म्हणत आहेत. जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्यांना त्यांची जागा दाखवा आणि भाजपाला गोरगरीब व सर्वसामान्यांची ताकद दाखवून द्या, महाराष्ट्रात गरिबांचेच सरकार हवे, असे प्रतिपादन त्यांनी उपस्थिताना केले. यावेळी राहुल गांधी यांनी जिल्'ातील कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे वाचत त्यांना व्यासपीठावर बोलवित उपस्थित जनतेला त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.(प्रतिनिधी) इन्फो.. मोदी को आपको ही हटाना हंै उपस्थितांपैकी कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाव, मोदी हटाव’चा नारा दिल्यावर राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे पाहून ‘अब आपको ही मोदी को हटाना हंै’ असे सांगताच हशा पिकला.