शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
5
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
6
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
7
बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
8
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
9
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
10
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
11
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
12
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
13
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
14
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
15
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
16
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
17
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
18
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
20
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष

आषाढातही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

सामान्यत: आषाढात कधीही मुहूर्त होत नाहीत. त्यामुळे आषाढाच्या आधी थांबलेले विवाह दिवाळीनंतरच होत असतात. आषाढात सामान्य शुभ कार्य केले ...

सामान्यत: आषाढात कधीही मुहूर्त होत नाहीत. त्यामुळे आषाढाच्या आधी थांबलेले विवाह दिवाळीनंतरच होत असतात. आषाढात सामान्य शुभ कार्य केले जात नाही. त्याचे कारण म्हणजे या काळापासून देव शयनी असतात, असे मानले जाते. त्यामुळे या कालावधीत लग्नासारखे शुभ कार्य होत नसले तरी यंदा कोराेनामुळे स्थिती बदलू लागली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाट येणार नाही, असे वाटत असतानाच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे भाकीत खरे ठरले आणि हाहाकार माजला. आता तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती लक्षात घेता काळजी घेतली जात असून, दिवाळीची वाट न बघता आता आषाढातच विवाह होत आहेत. विशेष म्हणजे दाते पंचांगसारख्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या पंचागांतदेखील आपत्कालीन मुहूर्त देण्यात आल्याने त्याला शास्त्रीय आधारही प्राप्त झाला आहे.

कोट...

आपत्कालीन परिस्थिती म्हणून आषाढात विवाह मुहूर्त दिले जात असून, त्यामुळे यंदा या महिन्यातदेखील लग्न होत आहेत. आपत्काळात विवाह सोहळ्याचे मुहूर्त पंचांगात देण्यात आले असून, त्यानुसार यंदा प्रथमच विवाह सोहळे होत आहेत.

- अमित गायधनी, पुरोहित

कोट..

जीवन व्यवस्थेत बदल झाल्याने चातुर्मासात आणि गुरू किंवा अस्त काळात विवाह मुहूर्त देता येईल काय, याबाबत राज्यातील पंचांगकर्त्यांनी २०१९पासूनच आपत्कालीन मुहूर्त देणे सुरू केले. यजमान, मंगल कार्यालय आणि गुरूजी यांच्या सोयीचा त्यात विचार असून, हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.

- रत्नाकर संत गुरूजी

इन्फो...

परवानगी पन्नासची पण...

कोरोना संकटामुळे राज्य शासनाने विवाह सोहळ्यांसाठी असलेले निर्बंध शिथिल केलेले नाहीत. त्यामुळे सध्या पन्नास जणांनाच विवाह सोहळ्याला परवानगी आहे. अर्थात आता अनेक ठिकाणी गर्दीचे नियम पाळले जात असून, अनेक ठिकाणी वऱ्हाडी येऊन जाऊन असल्याने पन्नासपेक्षा अधिक वऱ्हाडी येतात. ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक गर्दी असते.

इन्फो...

मंगल कार्यालये बुक

- नाशिक शहरातील बहुतांश मंगल कार्यालये विवाह सोहळ्यामुळे बुक होत असून, कोरोना काळात व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

- कोरोनामुळे निर्बंधांचे पालन करतानाच सर्व शासकीय यंत्रणांच्या परवानग्या घेऊनच लग्न सोहळे होत आहेत.

- केवळ मंगल कार्यालयेच नव्हे; तर हॉटेल्स चालकांनादे‌खील या निर्णयामुळे सुगीचे दिवस आले असून, तेथे तसेच शहराबाहेरील फार्म हाऊसमध्येही बार उडत आहेत.