शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

स्वदेशीच्या माध्यमातूनच ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 20, 2015 22:35 IST

योगदीक्षा शिबिर : विदेशीवर हल्लाबोल करीत रामदेवबाबांचा कर्मयोग करण्याचा सल्ला; सिन्नरला प्रचंड प्रतिसाद

सिन्नर : देशाला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेतच; मात्र नागरिकांनी स्वदेशीचा अवलंब केल्यास पैसा वाचेल. देशातील पैसा देशातच राहील. या पैशातून देशसेवा घडेल. त्यामुळे स्वेदशीच्या माध्यमातून ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. सिन्नर महाविद्यालयाच्या मैदानावर पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान न्यासच्या वतीने रामदेवबाबांच्या योगदीक्षा सभा व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ‘योग से राष्ट्र निर्माण’ या विषयावर बोलताना रामदेवबाबा यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले. आयोजन समितीचे अध्यक्ष तथा आमदार राजााभाऊ वाजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योगदीक्षा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ंयावेळी मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, त्र्यंबकबाबा भगत, उदय सांगळे, निवृत्ती डावरे, सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, पांडू केदार, किसन आव्हाड, यशपाल आर्य, आनंद कर्नाटकी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नागरिकांनी पहाटे उठून योग करावेत आणि दिवसभर आपापला उद्योग व्यवसाय करावा. यालाच कर्मयोग म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने कर्मयोग करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मानवी शरीरासाठी ज्याप्रमाणे प्रोटिन, कॅल्शीयम व हिरव्या भाज्यांची गरज असते. त्यामुळे आपल्या मेंदूला योग व गायत्री मंत्राचा खुराक आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सकाळी लवकर उठून योग केल्यास आजारी पडून आपले नुकसान होणार नाही असे त्यांनी सांगितले. रोगी होण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी त्यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’चा मंत्र दिला. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या संत-ऋषींच्या भूमीत आपण जन्म घेतला असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले. आपले आचरण ऋषींसारखे असले पाहिजे असे ते म्हणाले. प्रत्यकाने शूरवीर बनण्याची गरज असून, कमजोर व भेकड असू नये असे त्यांनी सांगितले. काम करणारेच यशस्वी होतात. काम आणि मेहनत यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही वस्तू खरेदी करताना त्या देशी असल्या पाहिजे, असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला. विदेशी वस्तूंची किंमत जास्त असण्यासह त्यापासून देशाला कोणताही फायदा नसल्याचे रामदेवबाबा यांनी उपस्थिताना सांगितले. विदेशी कंपन्या देशाचा पैसा लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशी का विदेशी यातून नागरिकांनी योग्य पर्याय निवडावा, असे आवाहन त्यांनी केले. तन, मन अािण धन लुटणाऱ्या विदेशी उत्पादनावर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. सकाळी लवकर उठून योग करणे, निर्व्यसनी रहावे व स्वदेशीचा वापर असे तीन संकल्प प्रत्येकाने करावेत, असे आवाहन रामदेवबाबा यांनी केले. महाराष्ट्रातील सर्व व्यसने आजपासून आपण आपल्या झोळीत घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मरणानंतर कफनही स्वदेशीच असले पाहिजे असा आग्रह धरा, असे ते म्हणाले. कोणत्याही कामामुळे देशाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.(वार्ताहर)