शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

गोणी लिलावाला विरोध : उमराणेत रास्ता रोको; पिंपळगाव येथे लिलाव पाडले बंद

By admin | Updated: July 26, 2016 21:49 IST

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कळवण/उमराणे/पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सडू लागला असून, दुसरीकडे शासन धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केल्याने बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला असून, कांदा लागला सडू आणि शेतकरी लागला रडू अशी स्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासन धोरण आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, कांदा गोणी लिलाव पद्धतीच्या निषेधार्थ उमराणे येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, तर पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कळवण येथे उद्या, बुधवारी (दि. २७) सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, गुरुवारी (दि. २८) कळवण बंदची हाक देण्यात आली आहे.जिल्ह्यातील बाजार समित्या १५ दिवसांपासून बंद असल्याने बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याचे बाजारभाव कधी वाढतील याची शाश्वती नसल्याने चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा व्यापाऱ्यांची मनधरणी करून कांदा विक्रीसाठी व चांगल्या बाजारभावासाठी व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवित असून, गरज समजून मात्र शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.शासनाच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केले असल्याने बाजार समित्या बंद आहेत. समितीच्या आवारात गेल्या ११ जुलैपासून कांदा लिलाव बंद असल्याने कळवण तालुक्यात कांदा व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी सुरू करण्यात आली आहे. बाजारभाव नसल्याने भांडवल वसूल होईल या आशेने शेतकरी कांदा विक्री करत आहेत.कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. बाजारभाव नसल्याने शेतकरी बांधवांनी कांद्याची चाळीत साठवणूक केली असून, कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊस, हवामानातील बदल या सर्वांचा फटका तालुक्यातील कांदा उत्पादकांना बसला आहे. दरवर्षी उत्तमरीत्या टिकणाऱ्या कांद्याचे उत्पादन कळवण व लगतच्या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. गेल्या वर्षी बियाणात मोठ्या प्रमाणात फसवणूक व त्यामुळे डोंगळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात झालेली वाढ तसेच अवकाळी पावसाचा फटका, वातावरणातील बदल यामुळे तालुक्यात कांदा उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कांदा चाळी बांधल्या. बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदे चाळीत साठवले. परंतु दिवाळीपर्यंत टिकणारा कांदा सध्या मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. (लोकमत ब्युरो)