शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

गोणी लिलावाला विरोध : उमराणेत रास्ता रोको; पिंपळगाव येथे लिलाव पाडले बंद

By admin | Updated: July 26, 2016 21:49 IST

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कळवण/उमराणे/पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सडू लागला असून, दुसरीकडे शासन धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केल्याने बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला असून, कांदा लागला सडू आणि शेतकरी लागला रडू अशी स्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासन धोरण आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, कांदा गोणी लिलाव पद्धतीच्या निषेधार्थ उमराणे येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, तर पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कळवण येथे उद्या, बुधवारी (दि. २७) सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, गुरुवारी (दि. २८) कळवण बंदची हाक देण्यात आली आहे.जिल्ह्यातील बाजार समित्या १५ दिवसांपासून बंद असल्याने बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याचे बाजारभाव कधी वाढतील याची शाश्वती नसल्याने चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा व्यापाऱ्यांची मनधरणी करून कांदा विक्रीसाठी व चांगल्या बाजारभावासाठी व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवित असून, गरज समजून मात्र शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.शासनाच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केले असल्याने बाजार समित्या बंद आहेत. समितीच्या आवारात गेल्या ११ जुलैपासून कांदा लिलाव बंद असल्याने कळवण तालुक्यात कांदा व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी सुरू करण्यात आली आहे. बाजारभाव नसल्याने भांडवल वसूल होईल या आशेने शेतकरी कांदा विक्री करत आहेत.कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. बाजारभाव नसल्याने शेतकरी बांधवांनी कांद्याची चाळीत साठवणूक केली असून, कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊस, हवामानातील बदल या सर्वांचा फटका तालुक्यातील कांदा उत्पादकांना बसला आहे. दरवर्षी उत्तमरीत्या टिकणाऱ्या कांद्याचे उत्पादन कळवण व लगतच्या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. गेल्या वर्षी बियाणात मोठ्या प्रमाणात फसवणूक व त्यामुळे डोंगळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात झालेली वाढ तसेच अवकाळी पावसाचा फटका, वातावरणातील बदल यामुळे तालुक्यात कांदा उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कांदा चाळी बांधल्या. बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदे चाळीत साठवले. परंतु दिवाळीपर्यंत टिकणारा कांदा सध्या मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. (लोकमत ब्युरो)