शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमाला परिसरात पूरस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:48 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देओंडओहोळ ओव्हरफ्लो : अस्वली, नांदूरवैद्य येथील नागरिकांचा घोटीशी संपर्कतुटला

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.इगतपुरीच्या पूर्व भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ब्रिटिशकालीन दारणा धरणसाठ्यात वाढ होत आहे. दारणा नदीपात्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील मुख्य पीक असलेले भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून, परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदे दुमाला परिसरातदेखील पूरजन्य स्थिती असून, महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटल्यामुळे दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहत परिसरातदेखील पावसाने कहर केला असून, येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार पावसामुळे येथील दशक्रि या हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील ममहामार्गालगत असलेल्या आनंदवन सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इगतपुरी प्रशासन सज्ज आहे.नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी केले आहे. भातशेती पाण्याखाली इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्यामुळे तालुक्यात सध्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जोरदार पावसामुळे येथील मुख्य पीक भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून तातडीने पंचनामे करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.