शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

गोंदे दुमाला परिसरात पूरस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:48 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देओंडओहोळ ओव्हरफ्लो : अस्वली, नांदूरवैद्य येथील नागरिकांचा घोटीशी संपर्कतुटला

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.इगतपुरीच्या पूर्व भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ब्रिटिशकालीन दारणा धरणसाठ्यात वाढ होत आहे. दारणा नदीपात्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील मुख्य पीक असलेले भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून, परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदे दुमाला परिसरातदेखील पूरजन्य स्थिती असून, महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटल्यामुळे दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहत परिसरातदेखील पावसाने कहर केला असून, येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार पावसामुळे येथील दशक्रि या हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील ममहामार्गालगत असलेल्या आनंदवन सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इगतपुरी प्रशासन सज्ज आहे.नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी केले आहे. भातशेती पाण्याखाली इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्यामुळे तालुक्यात सध्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जोरदार पावसामुळे येथील मुख्य पीक भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून तातडीने पंचनामे करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.