शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गोंदे दुमाला परिसरात पूरस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:48 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देओंडओहोळ ओव्हरफ्लो : अस्वली, नांदूरवैद्य येथील नागरिकांचा घोटीशी संपर्कतुटला

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.इगतपुरीच्या पूर्व भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ब्रिटिशकालीन दारणा धरणसाठ्यात वाढ होत आहे. दारणा नदीपात्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील मुख्य पीक असलेले भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून, परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदे दुमाला परिसरातदेखील पूरजन्य स्थिती असून, महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटल्यामुळे दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहत परिसरातदेखील पावसाने कहर केला असून, येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार पावसामुळे येथील दशक्रि या हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील ममहामार्गालगत असलेल्या आनंदवन सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इगतपुरी प्रशासन सज्ज आहे.नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी केले आहे. भातशेती पाण्याखाली इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्यामुळे तालुक्यात सध्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जोरदार पावसामुळे येथील मुख्य पीक भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून तातडीने पंचनामे करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.