शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्या सुवर्णकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:13 IST

नाशिक : पाश्चिमात्य देशात ६० ते ७० टक्के अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगांवर अवलंबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून येथे ...

नाशिक : पाश्चिमात्य देशात ६० ते ७० टक्के अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगांवर अवलंबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून येथे ६० ते ७० टक्के लघुउद्योग आहेत. त्याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने नवउद्योजकांना सध्या मोठी संधी आहे. कोरोनाचे संकट असले तरी सध्याचा काळ नवउद्योजकांसाठी सुवर्णकाळ असल्याचे मत प्रख्यात अर्थतज्ज्ञ डाॅ. वरदराज बापट यांनी व्यक्त केले.

भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिसंवाद - २०१६, २०२०, २०२४ आणि पुढील वाटचाल या विषयावर शनिवारी ( दि. २७ ) आयोजित ऑनलाईन परिसवांदात डॉ बापट बोलत होते. त्यामध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, दिलीप शेनॉय, सचिन कुमार, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे आदी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगातील व्यवस्थापनाचा अनुभव या हेतूने विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. बापट यांनी जीएसटी करप्रणालीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. संपूर्ण जग कोरोनाकडे वाटचाल करीत असताना मागील अनेक वर्षात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था टिकून आहे. २००८ मध्ये जागतिक मंदी, सध्या २०२१ मध्ये कोरोना संकट असले तरी सन २०२४ मध्ये नक्कीच असेल. या पूर्वी सरकारी धोरणे मोठ्या उद्योगांना केंद्रित करणारी होती; मात्र मोदी सरकारने देशातील ७० टक्के लघुउद्योगांना डोळ्यासमोर ठेवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाल्याचे डॉ. बापट यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आशुतोष रारावीकर यांनी करीत विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राबद्दल माहिती दिली. दिलीप शेनॉय आणि मिलिंद कांबळे यांनी काही वर्षांपूर्वी नवउद्योजक परदेशात जायचे ते आता देशातच काय नवीन करता येईल, याचा विचार करतात. यातच आत्मनिर्भर भारताचे यश दिसून येत असल्याचे सांगितले. सचिन अरोरा यांनी थेट परकीय गुंतवणुकी मुळे स्थानिक उद्योगांना फटका बसल्याचे सांगितले. त्याशिवाय इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राहुल वैद्य, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. शीतल गुजराथी यांनी मार्गदर्शन केले. संचालिका डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी वक्त्यांचे स्वागत आणि प्रस्तावनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

इन्फो

अर्थशास्त्राने जीवन होते सुंदर

यावेळी बोलताना डॉ. रारावीकर म्हणाले की मानवी जीवनात सर्वार्थाने अर्थ भरणाऱ्या अर्थशास्त्राने जीवन सुंदर होते. अर्थशास्त्र हे जीवन असून मानवी जीवनात ही अर्थशास्त्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्राचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा, असेही त्यांनी नमूद केले.

फोटो

२७ भोसला