शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठाची शेती पाण्याखाली

By admin | Updated: August 8, 2014 00:57 IST

गोदाकाठाची शेती पाण्याखाली

 कसबे सुकेणे : गोदावरी व दारणा धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या पूरपाण्यानंतर नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्यामुळेच गोदाकाठची संपूर्ण शेती पुराच्या पाण्याखाली गेली, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, असल्याचा आरोप चांदोरी व गोदाकाठच्या ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दारणा व गंगापूर धरण व दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी, दारणा व बाणगंगा या नद्यांना मोठा पूर आला होता. दारणा व गंगापूर धरणातून एकाचवेळी करण्यात आलेल्या विसर्गामुळे चांदोरी सायखेड्यासह गोदाकाठावर पूरपरिस्थती निर्माण होऊन द्राक्षबागा व पिके पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या पूरपरिस्थितीला गंगापूर, दारणा व नांदूरमधमेश्वर धरणाच्या प्रशासनाच्या असमन्वय जबाबदार असून नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्याने गोदेच्या पुराचा फुगवटा हा गोदाकाठाच्या चाटोरीपर्यंत राहिला. त्यामुळे काठालगतची शेती पुराच्या पाण्याखाली गेली असल्याचे चांदोरी येथील सुरेश भोर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून तसेच प्रतिकुल हवामानावर मात करीत या भागात द्राक्षबागा जगविल्या असताना पाटबंधारे जलसंपदा खात्याच्या परस्पर असमन्वयामुळेच गोदाकाठावर पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याचे सुरेश भोर, चांदोरीचे उपसरपंच पुष्कर हिंगणे, मधुकर भोर, सोमनाथ गडाख, बाळू शेटे आदिंसह चांदोरी, चाटोरी, सायखेडा, शिंगवे, नागापूर भागातील शेतऱ्यांनी केली आहे. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मौजे सुकेणे शिवारातही शेतीचे नुकसान झाले आहे. मौजे सुकेणे गावाच्या शिवारात असलेल्या बाणगंगा नदीवरील वसंत बंधारा पुरामुळे वाहून गेला आहे. शासनाने हा बंधारा पुन्हा बांधून परिसरातील जलसिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही मौजे सुकेणेचे उपसरपंच विजय मोगल व ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे.जलसंपदा विभागाच्या गलथान प्रशासकिय असमन्वयामुळे गोदाकाठावर मानव निर्मीत पुरपरिस्थीती निर्माण झाली आहे. शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले असुन शासनाने गोदाकाठाच्या पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. - सुरेश भोर, शेतकरी , चांदोरी बाणगंगेला आलेल्या पुरामळे मौजे सुकेणे गावाच्या शिवारातील वसंत बंधारा वाहुन गेला आहे. त्यामुळे शेकडो क्युसेक पाणी वाहुन जात असुन शासनाने हयाठिकाणी नवा बंधारा बांधण्याविषयी पाउले उचलावी. - विजय मोगल, उपसरपंच मौजे सुकेणे