शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

गोदाकाठी दिवसभर संततधार !

By admin | Updated: July 15, 2017 01:09 IST

सायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे. पाण्यासोबत अनेक दिवसांपासून वाहून आलेल्या पानवेलींमुळे पूर पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सर्व पानवेल पुलाला अडकल्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार गेट खुले केले असून, त्यातून २३८८४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.गंगापूर धरणातून विसर्ग सुरु झाला तर पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावांकडे असते. गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडल्याने सायखेडा परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीलगतच्या वीटभट्ट्या पाण्यात बुडाल्या आहेत. यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडल्यास नदी धोक्याची पातळी ओलांडू शकेल. पानवेली अडकल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन पिके खराब होण्याची शक्यता आहे. करंजगाव येथील पुलालादेखील पानवेली अडकल्याने पाण्याचा जोर वाढून नदीच्या आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आहे. पावसाळा सुरू झाला तरी प्रशासनाने पानवेली न काढल्याने हा पूल आणखीच धोकादायक ठरू पाहत आहे.या संदर्भात पावसाळ्याच्या उपाय योजना म्हणून फक्त लोकमतने बातमी लावली होती मात्र अधिकारी यांनी पुलाचे काम सुरु असल्याने पानवेल काढणे शक्य नाही असे उत्तर दिले होते आज मात्र पानवेल अडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे आण िपाणी अडल्याने शेतात पाणी घुसले आहेपानवेलींमुळे पुलाला धोका गुरुवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. पाण्यात वाहून आलेल्या पानवेलींमुळे येथील पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पानवेळींमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण येत असून, पूर पाणी आजूबाजूच्या शेतात घुसण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, गंगापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींना फोनवरून तत्काळ निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती कळवून सायखेडा व करंजगाव या दोन्ही पुलांना अडकलेल्या पानवेली काढण्याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने सतर्क राहून तत्काळ पानवेली काढावी, अशी मागणी करण्यात येत आहे.