शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

गोदाकाठी दिवसभर संततधार !

By admin | Updated: July 15, 2017 01:09 IST

सायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे. पाण्यासोबत अनेक दिवसांपासून वाहून आलेल्या पानवेलींमुळे पूर पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सर्व पानवेल पुलाला अडकल्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार गेट खुले केले असून, त्यातून २३८८४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.गंगापूर धरणातून विसर्ग सुरु झाला तर पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावांकडे असते. गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडल्याने सायखेडा परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीलगतच्या वीटभट्ट्या पाण्यात बुडाल्या आहेत. यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडल्यास नदी धोक्याची पातळी ओलांडू शकेल. पानवेली अडकल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन पिके खराब होण्याची शक्यता आहे. करंजगाव येथील पुलालादेखील पानवेली अडकल्याने पाण्याचा जोर वाढून नदीच्या आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आहे. पावसाळा सुरू झाला तरी प्रशासनाने पानवेली न काढल्याने हा पूल आणखीच धोकादायक ठरू पाहत आहे.या संदर्भात पावसाळ्याच्या उपाय योजना म्हणून फक्त लोकमतने बातमी लावली होती मात्र अधिकारी यांनी पुलाचे काम सुरु असल्याने पानवेल काढणे शक्य नाही असे उत्तर दिले होते आज मात्र पानवेल अडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे आण िपाणी अडल्याने शेतात पाणी घुसले आहेपानवेलींमुळे पुलाला धोका गुरुवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. पाण्यात वाहून आलेल्या पानवेलींमुळे येथील पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पानवेळींमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण येत असून, पूर पाणी आजूबाजूच्या शेतात घुसण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, गंगापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींना फोनवरून तत्काळ निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती कळवून सायखेडा व करंजगाव या दोन्ही पुलांना अडकलेल्या पानवेली काढण्याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने सतर्क राहून तत्काळ पानवेली काढावी, अशी मागणी करण्यात येत आहे.