शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठी दिवसभर संततधार !

By admin | Updated: July 15, 2017 01:09 IST

सायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे. पाण्यासोबत अनेक दिवसांपासून वाहून आलेल्या पानवेलींमुळे पूर पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सर्व पानवेल पुलाला अडकल्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार गेट खुले केले असून, त्यातून २३८८४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.गंगापूर धरणातून विसर्ग सुरु झाला तर पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावांकडे असते. गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडल्याने सायखेडा परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीलगतच्या वीटभट्ट्या पाण्यात बुडाल्या आहेत. यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडल्यास नदी धोक्याची पातळी ओलांडू शकेल. पानवेली अडकल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन पिके खराब होण्याची शक्यता आहे. करंजगाव येथील पुलालादेखील पानवेली अडकल्याने पाण्याचा जोर वाढून नदीच्या आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आहे. पावसाळा सुरू झाला तरी प्रशासनाने पानवेली न काढल्याने हा पूल आणखीच धोकादायक ठरू पाहत आहे.या संदर्भात पावसाळ्याच्या उपाय योजना म्हणून फक्त लोकमतने बातमी लावली होती मात्र अधिकारी यांनी पुलाचे काम सुरु असल्याने पानवेल काढणे शक्य नाही असे उत्तर दिले होते आज मात्र पानवेल अडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे आण िपाणी अडल्याने शेतात पाणी घुसले आहेपानवेलींमुळे पुलाला धोका गुरुवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. पाण्यात वाहून आलेल्या पानवेलींमुळे येथील पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पानवेळींमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण येत असून, पूर पाणी आजूबाजूच्या शेतात घुसण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, गंगापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींना फोनवरून तत्काळ निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती कळवून सायखेडा व करंजगाव या दोन्ही पुलांना अडकलेल्या पानवेली काढण्याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने सतर्क राहून तत्काळ पानवेली काढावी, अशी मागणी करण्यात येत आहे.