शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नाशिकची गोदावरी मृत्युशय्येवर

By admin | Updated: August 8, 2014 02:09 IST

नाशिकची गोदावरी मृत्युशय्येवर

 

नाशिक : नाशिकची गोदावरी नदी ही पूर्वी आजारी होती, ती आता मृत्युशय्येवर आहे. गोदावरी जर मृतप्राय झाली तर नाशिककरांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देतानाच जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी, गोदावरीचे प्रदूषण थांबवायचे असेल तर नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी थांबवून त्याचा वापर शेती-उद्योगासाठी करण्याचा सल्ला दिला. किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारकात वसुंधरा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी आगामी कुंभमेळ्याविषयी विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्रसिंह यांनी सांगितले, गोदावरी नदी स्नानायोग्य राहिली नसून ती नाला बनली आहे. कुंभमेळ्याला वैज्ञानिक आधार आहे. पर्वणी काळात सूर्य सिंह राशीत जात असल्याने त्यावेळी आॅक्सिजनचे प्रमाण वाढलेले असते. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा, प्रजा व ऋषीमुनी एकत्र येत असत आणि विचारांचे आदानप्रदान करत असत. परंतु आता कुंभमेळ्याला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. अंधविश्वास वाढला आहे. महापालिकेने गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी खूप खर्च केला असला तरी सांडपाणी विसर्जनाची व्यवस्था वेगळी केली नाही तर कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. गोदावरी नदीवर बनविले जाणारे घाटही नदीतील नैसर्गिक रचनेला धोकादायक ठरत आहेत. गोदावरी किनारी पिंपळवृक्ष, कदंब, निंब आदि वृक्षांची लागवड केल्यास पाणीशुद्धीकरणासाठी त्याची मदत होऊ शकेल. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा वापर शेती व उद्योगासाठी करण्याचा सल्लाही डॉ. राजेंद्रसिंह यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक सचिन महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गोविंद माळी, राजेश पंडित, अमृता पवार यांनी सहभाग घेतला. वसंधुरा क्लबचे वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)